चौकीदार भी चोर है!… राजेन्द्र पातोडे


भारतीय जनता पार्टीने ६० अब्ज रुपयांहून अधिकची रक्कम निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वटवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आहे. तृणमूल काँग्रेसने १६ अब्ज रुपये किमतीची रक्कम निवडणूूक रोख्यांच्या माध्यमातून वटवली आहे.
सर्वांत जास्त निवडणूक रोख्यांची खरेदी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसने केली आहे. या कंपनीने एकूण १३६८ बाँडची खरेदी केली. ज्यांची किंमत आता १३.६ अब्ज रुपयांहून अधिक आहे.
तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी १४ अब्ज रुपयांचे बाँड वटवले आहेत. त्यानंतर के. चंद्रशेखर राव यांना १२ अब्ज रुपयांचे बाँड वटवले आहेत. त्यानंतर बिजू जनता दलाने ७ अब्ज रुपयांची रक्कम बाँडच्या माध्यमातून वटवली आहे. पाचव्या क्रमांकावर तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमके आहे तर सहाव्या क्रमांकावर जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस आहे.
अशी होते वसुली.
कोविशील्डची बनावट लस बनवणाऱ्या कंपनीने भारत जलाओ पार्टीला ६२ कोटी रुपयांची देणगी दिली, भाजपने उच्च किमतीत लस खरेदी केली आणि त्याबदल्यात पूनावाला यांच्याकडून थेट कमिशन घेतले आणि हीच रक्कम प्रुडंटच्या पुस्तकात नोंदवली गेली. थेट किंवा रोख स्वरूपात हस्तांतरित केलेली रक्कम अद्याप समोर येणे बाकी आहे.
ईडीने रुईया बंधूंवर कारवाई करताच, एस्सार समूह देतो ५० कोटी रुपये.
आरसेलर मित्तलच्या मालकांनी सरकारला एस्सार प्रकरणात सुरू असलेल्या तपासात त्यांना बचावाची संधी देण्याची विनंती केली, नंतर मित्तल समूहाने वेगवेगळ्या तारखांना १२० कोटी रुपयांची देणगी दिली.
भारती एअरटेलवर ७०० कोटी रुपयांचे कस्टम ड्युटी आणि कर चुकवण्याचे प्रकरण सुरू होते, भारती एअरटेलने ४० कोटी रुपयांची देणगी दिली आहे, आज ते प्रकरण कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही.
जीएमआरवर ईडीचे छापे पडले, काही देणगी द्यावी लागली, काही कंपनी भगबअदानीला विकावा लागला.
ईडीने फ्युचर गेमिंगवर छापे टाकले, कंपनीने १०० कोटी रुपयांची देणगी दिली.
RPSG ग्रुपवर ईडीचे छापे, त्यांनी ४५ कोटी रुपयांची देणगी देखील दिली.
मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात, डीएलएफ ग्रुपवर देशभर छापे टाकण्यात आले आणि कंपनीने २५ कोटी रुपयांची देणगी दिली.
इलेक्ट्रॉल बॉण्ड ही पूर्णत: खंडणी आणि लाचखोरी करण्यासाठी आणलेली योजना होती.हा त्याचा धडधडीत पुरावा आहे, चौकीदार म्हणून दरोडे टाकत सरकार चालवत आहे हे विरोधकांनी जनतेसमोर आणले पाहिजे.सरकार ‘वसुली भाई’ च्या भूमिकेत आले आहे, त्यांना दोन ‘अनमोल रतन’ म्हणून ई डी आणि से बी आय मदत करीत आहे.आधी छापे टाकणार मग पैसे घेऊन प्रकरण दडपणार.म्हणूनच स्टेट बँकेने जून पर्यंत ही माहिती सार्वजनिक करायला टाळाटाळ केली होती.
धार्मिक परंपरा वर प्रवचन देणारे जुगार कंपनी तसेच पाकिस्तानी कंपनी हब पॉवर कडून पुलवामा हल्ल्या आधी देणगी घेतली होती.
लूट लो इंडिया स्कीम आहे…
राजेन्द्र पातोडे
प्रदेश प्रवक्ते
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
094221 60101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत