दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

बहुजनांचा खरा राम : कांशिराम. . . !

शुद्र – अतिशुद्रांना माणुस म्हणुन जे निसर्गदत्त अधिकार आहेत ते ज्या व्यवस्थेने नाकारले त्या व्यवस्थेला नाकारुन मानवतावादी व्यवस्था निर्माण करणार्या बुध्द – फुले- शाहु- पेरियार – बाबासाहेब याच बहुजन महानायकांच्या विचारधारेचा साधा कार्यकर्ता ते भारतीय राजकारणाला शुन्य ते शिखरापर्यंत घेऊन जाऊन या देशातल्या मृतवत झालेल्या बहुजणांना राजसिंहासनावर विराजमान करणारे मान्यवर कांशिरामची एकमेव शिरोमणी, बहुजनांचे प्रतिपालक होते. आज त्याच बहुजन महानायकाच्या जयंती निमीत्त झोपलेल्या, कोमात गेलेल्या, शुद्धीवर येऊ पहाणार्या, प्रस्थापित व्यवस्थेने अपाहीज करुन ठेवलेल्या समस्त बहुजन समाजाला हार्दीक शुभेच्छा. . . !

ज्यांचा जन्म गांधी – नेहरु च्या घरात झालेला नाही, अदानी – अंबानी सारखे ऊद्योगपती पाठीशी नाही, प्रिंट – ईलेक्ट्राॅनिक मिडीया नाही, खोटे बोला पण रेट्टुन बोला असा स्वभाव पण नाही, खोट्या डिग्री पण नाही मला आश्चर्य वाटते या माणसाचे देवा -दिकांच्या ऊत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात कांशिराम नेतृत्वात चार – चारदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना आम्ही बहन मायावतीजींना बघितले आहे.

ईमानदार मिडीयाने कांशिराम – मायावतींचा जीवन संघर्ष आणि त्यांच्या कामाची खरी नोंद घेतली तर हा प्रवास ऊलगडायला कित्येक महीने लागतील. . .पण बहुजनांना गुलामीत ढकलणारे त्यांना कधीच जागृत होऊ देणार नाही.

ऊपेक्षित, दुर्लक्षित, लाचार, गुलाम असणार्या बहुसंख्य पण सत्तेत नगण्य वाटा असणार्या समाजाला मोठी स्वप्ने बघायला लावणारे कांशिराम बहुजणांचे खरे तारणहार आहेत. आमदार – खासदार – मंत्री बनणे कुण्या बाबु – भैय्या – काकु ची मक्तेदारी नव्हे तर सामान्यातला सामान्य माणुसही भरारी मारु शकतो हे सिध्द करुन दाखवले , लोकशाहीची खरी परिभाषा लोकांना समजाऊन दिली.

साहेब कांशिराम यांच्या राजकारणातला खरा हिरो हा आम आदमी होता, बसपा मध्ये जे आमदार -खासदार- मंत्रि झाले त्यांचा ईतिहास बघा , रस्त्यावरचा माणुस खरा नायक होता.

तुमच्या मुलांचे शिक्षण, तुमच्या मुलांचा रोजगार, तुमच्या मुलांचे आरक्षण, संविधान सन्मान धोक्यात आणणार्या लोकांना तुम्ही पुन्हा आमदार- खासदार बणवणार कि तुम्हाला अपाहीज करु पहाणार्या व्यवस्थेचे वाभाडे काढणार सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

लिहीतांना एक गोष्ट पुन्हा – पुन्हा मनात यायची ती म्हणजे फसव्या प्रचारांच्या तुफानात वाहुन गेलेल्या बहुजनांना पैलतिरी आणने सोपे आहे का. . .? साहेब कांशिरामाच्या शब्दात सांगायचे तर “होऊ शकते”. क्युकी “बुंदो का लगातार बरसना, एक दिन नदीयोंका बहाव बन जाता है।”

मा. हंसराजभाऊ कुंभारे , माजी जिल्हाअध्यक्ष, बसपा चंद्रपूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!