महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

अमितभाई, रिक्षाके चक्के चुराये किसने? – आयु. शिवराम पाटील

  जळगाव ला गृहमंत्री अमित शहा आले.दहा पंदरा कोटीचा मंडप बांधला.श्रोते भाडोत्री आणले.भाषण ठोकतांना वाटले पाहिजे कि,काय सभा झाली!
 शाह यांनी जनतेच्या समस्यावर ब्र काढला नाही.दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत.शहांनी ब्र काढला नाही.शहांना शेतकऱ्यांच्या जगणे मरण्याशी काहीच सोयरसुतक नाही.त्यांना पाहिजे फक्त सत्ता,मत्ता.
   तीन चाकाची रिक्षा,ती पण बिन चाकाची.कशी चालेल?म्हणून लोकांनी आमच्या भाजपला मतदान करावे.कारण त्या रिक्षाची चाके आम्ही चोरुन नेली आहेत.ते म्हणू शकतात, आम्ही फुकट नाही घेतली.बदल्यात खोके पण दिले आहेत.
 मोदी शाह आणि कंपनी ने महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष फोडले.यातील कोणत्या सज्जन माणसाला पक्षात किंवा पक्षासोबत घेतले?याची यादी जाहीर झाली आहे.राणे, भुजबळ, अजितदादा,शिंदे,भुसे, गुलाबराव, अशोक चव्हाण अशी माणसे कोणत्या गुणवत्तेवर घेतली? हे आता लपून राहिलेले नाही.चोरी, भ्रष्टाचार यात कुशल आणि अनुभवी लोकांना सिलेक्ट करून पदावर  ठेवले.तिकडच्या पक्षात चोरी करण्याऐवजी आमच्या पक्षात येऊन चोरी करा.आमची लगान द्या.तर तुम्हाला इडी,बेडी,जेल वगेरे काहीच लागणार नाही.याची गॅरंटी देतो.यालाच म्हणतात,ये मोदीकी गॅरंटी है! जो चोर हमारे साथ आयेगा,वो जेलमे नही जायेगा.जो हमारे साथ नही आयेगा,वो जरूर जेलमे जायेगा.ये मोदीकी गॅरंटी है.यासाठीच मोदी शहांनी आपल्याच पक्षातील प्रामाणिक लोकांना बाजूला सारले.अमितभाई,आप लोगोने चोरोको पनाह दी है.जिन्हे जेलमे रखना चाहते थे.मतलब भाजप अब चोरोकी पार्टी बना डाली.तो पुर्व भाजपाके सज्जनोको दुसरा कोई पार्टी ढुंढना पडेगा.
 बिना चाकाची रीक्षा तर जमीनीत रूतली आहेच.पण ज्यांनी चाके चोरली त्याला तरी सज्जन म्हणायचे का?मतलब ,चक्का चुराकर चौराहेपर चिल्ला रहे हो,देखो मैने रीक्षा लंगडी कर दी.
   ये कोई शराफत नहीं, अमितभाई! ये गलत बात है.दुसरे पार्टीके चोर अपनी फौज मे भर्ती करना.ये पॉलिटिक्स नही.ये तो क्रिमिनल क्रियशन है.
    देशाचे गृहमंत्री आपला अमुल्य वेळ खर्च करून जळगावला आले.काय फरक पडला? येथे पोलिसांच्या समस्या सुटल्या का?येथे नागरिकांच्या समस्या सुटल्या का? येथे शेतकऱ्यांचा समस्या सुटल्या का?येथे तरूणांना नोकरीची संधी दिली का?मग,असे काय विधायक काम केले?काहीच नाही! एकाने दुसऱ्यावर,दुसऱ्याने तिसऱ्यावर शिंतोडे उडवले.कलगीतुराचा एक शो झाला.कव्वाली मुकाबलाचा एक पार्ट झाला."इशारोको अगर तुम समझो,राजको राज रहने दो."
 आम्हाला अपेक्षा असते.कोणी मोठा नेता जळगाव ला आला तर काही भले होईल.काही प्रशासनात सुधारणा होईल.काही विकासाचे काम होईल.पण पवार ठाकरे शाह येऊन फक्त लोकांची करमणूक झाली.लोकांनी येथेच ऐकले आणि येथेच सोडले.पण फजूल खर्च झाला.हा खर्च अधिकाऱ्यांकडून काढला होता.आता अधिकारी शेतकरी कामगार नागरिकांकडून काढतील.
 लोक आता शहाणे झाले आहेत.म्हणून स्वेच्छेने कोणी भाषण ऐकायला येत नाही.म्हणून भाड्याने ,रोजाने, जबरीने माणसे धरून भरून आणावे लागतात.हेच तर कांग्रेस करीत होती.तर तुम्ही असे काय नवीन आणि चांगले केले कि लोक भाषण ऐकायला येतील?
 मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, दोन्ही तिन्ही जिल्हा अध्यक्ष यांनी जळगाव शहरातील जिल्ह्यातील जनतेला अवगत करावे कि, अमित शहा जळगाव ला येऊन जळगाव चे काय भले केले?

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!