महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

आंबेडकरी चळवळीचे प्रखर नेतृत्व – कर्मवीर बाबू हरिदास आवळे.

ज्या समाजाची हीन दिन अवस्था होती, पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळत होती, स्वाभिमान शून्य जिवन व्यापन करावे लागत होते त्या समाजात जन जागृतीची लाट पसरविण्याचे महत्वपूर्ण कार्य परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. अनेक आंदोलन करुन आम्ही माणूस आहोत ही जाणिव करुन दिली. जन जागृतीची लाट विदर्भातील जनतेपर्यंत पोहचली. बाबू एल एन हरदास श्रीमंत दशरथ पाटील देविदास खोब्रागडे कालीचरण नदागवळी दिनी ही धुरा सांभाळून आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटत असत.

हया चळवळीचा धाक निर्माण झाला.1937च्या निवडणूकीत मध्यप्रदेश विधानसभा मध्ये बांबू एल एन हरदास देविदास खोब्रागडे दशरथ पाटील उमरेड वरून पाटील नदागवळी स्वतंत्र मजदूर पक्षातर्फे निवडून आले. व एल एन हरदास यांच्या नेतृत्वात विधानसभेत विरोधीपक्ष म्हणून भूमिका पार पाडली 1939,ला टी डी च्या बिमारीने बांबू एल एन हरदास यांचे निधन झाले.पक्षात पोकळी निर्माण झाली.ती भरून काढण्याचे कार्य बाबू हरिदास आवळे यांनी भरून काढले.घरावर तुळशीपत्र ठेवून पायाला भिंगरी बांधल्यागत सतत पक्ष वाढीच्या कार्यास वाहून. घेतले.समता सैनिक दल शेड्युल कास्ट फेडेरेशनमजबूत कसे होईल हाच ध्यास.वकिलीचा व्यवसाय असताना सुद्धा वकीलीचा उपयोग समाजातील गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी केला.
समाजावर होणारें अन्याय अत्याचार या विरूद्ध संघर्ष करून पिडीतांना न्याय मिळवून दिला व
सतनामी समाजात जनजागृती करून त्यांना आंबेडकरी चळवळीत सहभागी करून घेतले.दूर जंगल खोऱ्यात असलेल्या समाजाची संघटना तयार करून आंबेडकरी तत्त्वज्ञान समजावून सांगितले.हे कार्य करीत असताना तहान भुकेची पर्वा केली नाही. रेल्वे स्टेशनवर खाली धोतराच्या अर्धा भाग पसरवून झोपत असत. रेल्वेत प्रवास करतानाच कोर्टाच्या केसच्या अभ्यास करीत त्यांचे संपूर्ण आयुष्य चळवळीला समर्पित होते.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली .तीला अंमलात आणण्यासाठी लोकांत प्रचार व प्रसार केला.14/10/1956चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोकून दिले. कार्यकर्त्यांची फळी तयार करून प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून दिली. सीआयडी विभाग तयार करून विरोधी गटातील माहित काढून घेत असत धर्मांतराच्या कार्यात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून शस्त्र सहित कार्यकर्त्यांची टीम तयार केली होती.दीक्षा समारंभ व्यवस्थितरीत्या पार पाडला. बाबासाहेब आंबेडकर यांनी 30/9/1956ला दिली येथे अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडेरेशनची सभा आयोजित करून सभेत सविस्तर चर्चा करून शैडयूल कास्ट फेडेरेशन बरखास्त करून रिपब्लीकन पक्ष स्थापन करण्याचा एकमताने ठराव पास केला.रिपबलिकन पक्षाला मूर्त स्वरूप येण्या अगोदर च 6/12/1956ला महापरिनिर्वाण झाले. प्रेसिडियम तयार झाले सचिव म्हणून नियुक्ती झाली.3/10/1957ला पवित्र दीक्षा भूमीवर नागपूर येथे रिपब्लीकन पक्षांची स्थापना झाली.व उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.सभेत ठराव क्रमांक 2असा केला की ही अस्थायी अमेठी असून एका वर्षात सदस्य नोंदणी करून कार्यकारणी निवडावी.एक वर्षांनंतर ही कार्यकारणी अस्तित्वात राहणार नाही.पक्षात लोकशाही राहावी ह्या दृष्टिने हा ठराव करण्यात आला.
परंतु नेतृत्वाने याकडे दूरलक्ष केले. म्हणून दुरूस्त रिपब्लीकन पक्ष स्थापन करण्यात आला.तो लोकशाहीच्या संवर्धनासाठी.
ज्या दीक्षाभूमी वर दिक्षा समारंभ पार पडला त्या जागेवर 13/4/1957ला एका रात्री भगवान गोतम बुद्धांचा पुतळा उभा केला.पोलीस तक्रार झाली असता आंबेडकरी चळवळीचे सर्व म्होरके यांना विचारणा करण्यात आली तेव्हा सर्वांनी जबाबदारी घेण्यास नकार दिला. मुर्ती जब्त करण्याचा प्रसंग आला त्यावेळी आवळे बांबू पुढे आले म्हणाले की ही भगवान गोतम बुध्दाची मूर्ती असून मी बसविली आहेन्यायलीयन कारवाईस पुढे गेले.दीक्षा भूमीवर गोतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दान दिले व आजही ते पुतळे दीक्षाभूमीवर विराजमान आहेत.
लोक सभेचे रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असतानाच नागपूर येथे आलू छाया बिल्डिंग जवळ जाहिर सभेत भाषण करताना म्हणाले की लोक मला विचारतात की लोकसभेत जाऊन काय करणार मी काय करणार हे सांगण्याअगोदर काय करणार नाही हे सांगतो. मी बाबासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन पक्षाला बेईमान होणार नाही हे वाक्य पूर्ण करतिच त्यांना ह्रदयाचा झटका आला व खाली कोसळले तो दिन2/3/1971हया दिवसीय त्यांची प्राणज्योत मालवली आज 51 वर्ष होत आहे त्यांना विनम्र आदरांजली
विनायकराव जामगडे 7823093556
9372456389

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!