देशधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बुद्ध – आंबेडकरी साहित्याची आजची भरारी : दिशा – दशा आणि वास्तव !

✍️ डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’, नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

*”बुध्द – आंबेडकरी साहित्य”* तसे बघावे तर परस्पर एकजीव आहे. काही थोडे फार बदलाव वरवर दिसुन येतात ही ! परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सरते शेवटी बुध्दाच्या मार्गाचा स्वीकार करतात. *”बुध्दमय भारत”* हे बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम ध्येय होते. बुध्द – आंबेडकराचा जीवन संघर्षात बरीचं साम्य ही दिसुन येतात. बुध्दाचा पहिला संघर्ष हा *”रोहिणी नदी पाणी वाटपावरुन”* शाक्य युवा संघामध्ये झालेला प्रमुख विवाद होता. शाक्य संघाचे म्हणने सिध्दार्थास मान्य न झाल्यामुळे सिध्दार्थाला शाक्य संघ / आपले राज्य सोडुन जावे लागलेले होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी सुद्धा ३० मार्च १९२७ रोजी महाड जिल्हा रायगड येथे *”चवदार पाणी सत्याग्रह”* केला. बुध्दाचा दुसरा सत्याग्रह म्हणजे *”अनैतिक रीती रिवाजांच्या”* विरोधात होता. बुध्दाने अनिष्ट प्रथा – रूढी विरोधात बंड केले. अर्थात *”मानवी अधिकार प्राप्तीचा”* तो मुख्य लढा होता. बुध्दाचा लढा हा *”समतेचा”* होता. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी २ मार्च १९३० रोजी नासिकचा *”काळाराम मंदिर सत्याग्रह”* केला. सदर लढा ही *”मानव अधिकार प्राप्तीचा”* होता. *”समतेचा लढा”* होता. देवदर्शन हा प्रमुख उद्देश नव्हता. बुध्दांनी *”देवत्व संकल्पना”* नाकारली. बाबासाहेब ह्यांनी ही *”देवत्व संकल्पना”* नाकारली. बुध्दाचे अंतिम लक्ष *”बहुजन हिताय बहुजन सुखाय”* राहिलेले आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *”भारतीय संविधान”* ह्याचे लिखाण करुन *”संविधानिक मौलिक अधिकार”* मिळवुन दिलेले आहेत. सांगायचे असे की, बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी आम्हाला *”बुद्ध”* दिला. आमचा आदर्श हे *”बुद्ध साहित्य”* असायला हवे. *”दलित साहित्य”* हे तर कदापी नाही. *”दलितत्व भावना”* कोण शहाणा व्यक्ती स्वीकार करणार ? मग *”दलित साहित्याचा”* उदोउदो कश्यासाठी ? परतुं काही साहित्यिक पांढरपेशा वर्गानी *”दलित विचार”* तर काहीं साहित्यिक वर्गांनी *”कॅम्युनिस्ट विचार”* हा शोषित वर्गावर लादण्याचा प्रयत्न केला होता. आणि काळाच्या ओघात ती मंडळी ही सफल सुध्दा झालीत. परंतु *”सत्य हे सत्यचं असते.”* पुढे दलित साहित्य / कॅम्युनिस्ट साहित्य हा विचार मागे पडला. आणि *”बुध्द साहित्य”* हे माणसाच्या केंद्रस्थानी आले. आता तथाकथित पांढरपेशा वर्गाच्या गोरख विषयाकडे वळु या.
इहवादी साहित्यिक *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांनी मार्क्स ही सांगितला आणि सोबत केशवसुत ही सांगितला. *”रमाई”* वर लिखाण केले म्हणुन / वा बुध्द ह्यावर थोडेफार बोलले म्हणुन मनोहर ह्यांना आपण *आंबेडकरी – बौध्द साहित्यिक* म्हणायचे काय ? मनोहर ह्यांनी तर स्वतः:ला *”इहवादी”* मानलेले आहे. यशवंत मनोहर हे *”श्रध्दा / अंधश्रद्धा”* दोघांना समान समजुन *”श्रध्दा”* ही नाकारतात. बुध्द म्हणतात, *”सध्दा बिजं तण्ते वुट्ठि पञ्ञा मे | ……….”* (अर्थात : श्रध्दा हे माझे बी आहे. तपश्चर्या ही वृष्टी आहे. प्रज्ञा हा जु आणि नांगर आहे. पापलज्जा हा इसाड, चित्त ही दोरी, आणि स्मृती (जागृती) हा फाळ व चाबुक आहे. काय आणि वाचेचे मी संरक्षण करतो. उदरनिर्वाहाच्या आहारात संयमित असतो. सत्य हे माझे निंदन आहे. आणि संतोष ही माझी सुट्टी आहे. तसेच धुरा वाहणारा उत्साह योगक्षेमभिमुख (निर्वाणाभिमुख) जातो. व तेथे गेल्यावर तो परत येत नाही. तो शोकरहित होतो.) ह्या प्रकारे *”श्रध्दा”* ह्या विषयावर खुप काही बुध्द गाथा संदर्भ देता येतील. लेखाला शब्द मर्यादा असल्याने हा विषय आटोपता घेतो. यशवंत मनोहर ह्यांना व्यावसायिक साहित्यिक मानल्यास गैर होणार नाही. दुसरे साहित्यिक *प्रा. रावसाहेब कसबे / प्रा. हरी नरके* हे आंबेडकरी विचाराला *”गांधी विचारांची”* फोडणी देण्याचा प्रयास करीत असतात. ह्या दोन्ही लेखकांच्या *”गांधी फोडणीवर”* मी उत्तर दाखल माझे विचार लिहिलेले आहेत. ह्या दोघांना गांधींची कां गरज पडली ? हा प्रश्न आहे.
*”दलित पॅंथर”* ही ९ जुलै १९७२ ला अमेरिकेतील *”ब्लॅक पॅंथर”* ह्या कॅम्युनिस्ट विचारापासुन स्थापन झालेली एक सामाजिक संघटना. आम्ही युवा पिढी त्याकाळात गारद झालेली बघितली आहेत. *”ब्लॅंक पॅंथर”* (१९६०) चे संस्थापक मंडळीत *ह्युब न्युटान / ओटान फोर्ट / बॉबी स्कले* / ह्यांच्या सोबत *माल्कम एक्स* ह्यांच्या लिखाणातुन जन्माला आल्याचा एक इतिहास आहे. लिखाणाला शब्द मर्यादा असल्याने हा विषय आटोपता घेतो. प्रश्न आहे, *”बुध्द – फुले – शाहु – आंबेडकर विचारधारा”* भारतामध्ये असतांना *राजा ढाले / नामदेव ढसाळ / ज. वि. पवार* समान काही मंडळींना *”कॅम्युनिस्ट विचारधारा”* प्रभावाच्या नावाचा आसरा कां घ्यावा लागलेला आहे ??? दलित पॅंथर स्थापनेच्या एक वर्षापुर्वी *नामदेव ढसाळ* ह्यांच्या *”गोलपीठा”* ह्या काव्यसंग्रहाचा खुप उदोउदो झालेला होता. *”गोलपीठा”* ह्या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे *”वेश्यालयातील कविता.”* शब्द भाषा तर भयानक घाणेरडी आहे. काही वर्गांच्या न समजणाच्या पलिकडची. वेश्यांच्या जीवनातील कोणते संदर्भ आपण हे घ्यायला हवेत ? ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. *शरणकुमार लिंबाळे* ह्याला तर दलित कवि म्हणण्यास धन्यता दिसुन येते. लिंबाळे हा दलितत्व सोडायला तयार नाही तर, त्याला मिळालेल्या *”सरस्वती पुरस्कार”* ह्याची लाज वाटण्याचे काही कारण दिसत नाही. आणि *लोकनाथ यशवंत* हा स्वतः:ला तर *”वादीहिन कवि”* असल्याचे तो बोलुन गेला. लोकनाथ हा आंबेडकरी बांधिलकी नाकारत असल्यामुळे ह्या विषयावर अधिक काय बोलावे ? कदाचित प्रेत उचलतांना समाजाच्या *”चार लोकांची”* ही गरज असण्याचे कारण दिसत नाही.
सनदी अधिकारी ह्या पदावरून निवृत्त झालेले आमचे धम्म मित्र – *इ. झेड. खोब्रागडे* हे तर *”अफलातुन प्राणी”* आहेत. आंबेडकरी साहित्याला छेद देण्यास खोब्रागडेच्या मेंदुतुन *”संविधान साहित्य”* किडा हा जन्माला आला. *”भारताचे संविधान”* हे कसे साहित्य होणार आहे ? *”भारताचे संविधान”* हे *कायद्याचे पुस्तक* (Legal Book) नाही. तर ते *”कानुनी दस्तावेज”* (Legal Documents) आहे. दीक्षाभूमी नागपूरला झालेल्या *”संविधान साहित्य संमेलनाला”* माझी संघटना *”सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल”* द्वारा तिव्र विरोध केला गेला. *”उच्च न्यायालय”* नागपूर खंडपीठात याचिका क्र. ३९४०/२०१९ मी स्वतः *(डॉ मिलिन्द जीवने विरुद्ध संविधान फाऊंडेशन)* दाखल केली होती. विद्वत न्यायाधीश द्वय *रवी देशपांडे / विनय जोशी* ह्यांच्या बुध्दीची खुप कीव करावीशी वाटते. त्यांनी संविधान साहित्य संमेलन घेतल्याने माझ्या (डॉ जीवने) *”मुलभुत अधिकाराचे हनन होत नसल्यामुळे माझी सदर याचिका रद्दबातल केली.”* सदर याचिका ही माझ्या मुलभूत अधिकाराचे हनन होत असल्यामुळे दाखल केली नव्हती. *”भारतीय संविधानाची गरीमा कायम रहावी”* म्हणुन दाखल केली होती. साहित्य जर मान्य नसेल तर त्याला जाळले जावु शकते. जसे *”मनुस्मृती ग्रंथाचे दहन”* करण्यात आले होते. खोब्रागडे महाशयाच्या ह्या दुष्कृतीमुळे नवी दिल्लीच्या जंतरमंतर येथे *”संविधानाची होळी”* पेटविण्यात आली होती. असे बिनडोक लोक प्रशासनात सनदी अधिकारी नियुक्त होतातचं कसे ? हा प्रश्न आहे.
*”जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद”* ह्या नावाने विदेशात बिझनेस करणारे *प्रा. दीपक खोब्रागडे* एक अफलातून प्राणी आहे. जागतिक साहित्य परिषद आयोजनास विरोध करण्याचे काही कारण नाही. जागतिक साहित्य परिषदेचा आयोजन दर्जा जागतिक स्तरावरील असायला हवा. पण ह्या जागतिक साहित्य नावाने चक्क *”प्रवासी व्यापार”* !!! सोबत जातीयवादी *डॉ. गिरीश गांधी* ह्यांचा विशेष आशिर्वाद. तसे गिरीश गांधी ह्यांच्या आर्थिक सहकार्याने पुरस्कृत असणारे *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / इ. झेड. खोब्रागडे / स्मृतिशेष डॉ. भाऊ लोखंडे* सारखी काही मान्यवर होतीचं. आता तर *प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस* सारखी पंडा मंडळीसुद्धा आवाजी पोंगा वाजवीत आहेत. *पुरस्कार* तसेच *अध्यक्ष* पदाचा मोह आमच्या *”तथाकथित पांढरपेशा साहित्यिक वर्गाला”* दिसुन येतो. असाचं ह्या पुरस्काराच्या मागे धावणारा माझा जीवलग मित्र *प्रा. डॉ. प्रदिप आगलावे* हा सुद्धा गिरीश गांधी ह्यांच्या मागे धावतांना मला दिसुन आला. नामांकित नाटककार / आकाशवाणी नागपुर येथे कार्यक्रम अधिकारी असलेला माझा खुप जीवलग मित्र *अमर रामटेके* ह्यांच्या शब्दात *डॉ. गिरीश गांधी म्हणजे सांस्कृतिक डॉन.”* माझा जीवलग मित्र *प्रदीप आगलावे* हा तर महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर खंड प्रकाशनात खुप विवादाचा पात्र झाला. समाजशास्त्री – *प्रदीप आगलावे* ह्यांचे लिखाण बुद्ध – आंबेडकरी साहित्य विषयासी निगडित आहे काय ? हा तर संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *”जातीची”* समाजशास्त्रीय व्याख्या केली. *”Caste is a closed class.”* (जात हा बंद वर्ग आहे.) बाबासाहेब ह्यांची *”समाजशास्त्रीय थेयरी”* सुध्दा आहे. आमचे मित्र प्रदीप आगलावे ह्यांनी स्वतःची कोणती समाजशास्त्रीय थेयरी विषद केली ? हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. आम्ही *”अभ्यासक मंडळींनी”* ह्या विद्वानाकडुन अशी अपेक्षा करणे काही गैर होणार नाही.
बुध्द – आंबेडकरी साहित्य हा विषय खुप गहण विषय आहे. परंतु ह्या साहित्याला *”विद्रोह – नकार “* ह्यामध्ये सिमित करण्याचा प्रयत्न *”ब्राम्हण्य साहित्यिक वर्गांकडुन”* झालेला आहे. *”बुध्द साहित्य हे खरे तर, समस्त भाषा साहित्याची जननी आहे.”* बुध्द साहित्याचे संदर्भ *”ब्राम्ही लिपी”* (धम्म लिपी) / बोली भाषा – *”पाली भाषा”* निगडीत असतांना, सदर विषय रुजविण्याचा प्रयास कां गेला नाही ? हा प्रश्न आहे. बुध्द – आंबेडकरी साहित्यामध्ये *सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद / मानवतावाद / राष्ट्रवाद / प्रेम आयाम”* इत्यादींचा उहापोह झाल्याचा संदर्भ / संशोधन आम्हाला फार कमी दिसुन येतो. *”हिब्रू संस्कृत / अपभ्रंश भाषा”* ह्याचे उगम स्थान *”पाली भाषा”* आहे. हिब्रू संस्कृत ची लिपी *”ब्राम्ही लिपी”* आहे. आताची संस्कृत भाषा ही *”क्लासिकल संस्कृत”* असुन लिपी ही *”देवनागरी लिपी”* आहे. *कालीदास* ह्यांचा खुप उदोउदो होत असतांना कालिदास ह्यांच्या लिखाणात *”नैतिक वाद”* कुठे आहे ? कालीदास हा *”भोगवाद साहित्याचे प्रतिक”* आहे. ह्यावरुन कालीदास ह्यांचा *”जन्म – मृत्यु स्थान”* गुमनाम आहे. अर्थात कालीदास हा काल्पनिक पात्र दिसुन येतो. भारतातील *”भाषा साहित्यावर एकाधिकारशाही”* ब्राह्मण वर्गाची असतांना, *”आमचा हा साहित्यिक वर्ग”* ब्राह्मण पायाखाली लोळण कां घेतो ? ही आमची वेदना आहे. उपरोक्त कारणे ही *”आमच्या साहित्यिक वर्गाच्या वस्त्रहरण करण्याची”* आहेत, हे पुनश्च सांगायला नको !!!


▪️ डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’
नागपूर दिनांक ९ मे २०२५

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!