नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठविदर्भ

१५ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनअध्यक्षपदी प्रा रणजित मेश्राम !

     आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान असलेले लेखक, ज्येष्ठ पत्रकार व लोकप्रिय वक्ते म्हणून परिचित व प्रसिद्ध असलेले प्रा रणजित मेश्राम यांची यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

     सदर माहिती आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे सचिव एड आनंद गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिली. ते म्हणतात, रणजित मेश्राम हे वादळी व्यक्तिमत्व असून त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक विषयावर विपुल लेखन आहे. अभ्यासपूर्ण वक्तृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांचे फॅसिस्ट वृत्तीवर कोरडे ओढणारे लिखाण व प्रत्यक्ष आंदोलनातील सहभाग आंबेडकरी चळवळीला योगदान देणारे आहे. 

     येत्या २४,२५ व २६ फेब्रुवारी असे तीन दिवसीय होणारे हे संमेलन यवतमाळातील आझाद मैदान येथे होणार आहे.‌ नुकतीच अकादमी व चाहत्यांची बैठक विश्राम गृह, यवतमाळ येथे झाली, तिथे हे ठरले. 

   या त्रिदिवसीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे माजी गृहमंत्री मा माणिकराव ठाकरे हे राहणार आहेत.
यापूर्वी वामनदादा कर्डक, बाबूराव बागुल, डॉ गंगाधर पानतावणे, डॉ यशवंत मनोहर, डॉ रावसाहेब कसबे, प्रा अरुण कांबळे या दिग्गजांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

    लवकरच संमेलनातील विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार असून संपूर्ण संमेलन कार्यक्रम घोषित करण्यात येईल असेही आनंद गायकवाड यांनी म्हटले. सदर संमेलन हे दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!