“चला बुद्ध विहाराला ज्ञानाचे केंद्र बनवूया”

आपल्याला कळविण्यास आनंद वाटतो की आज आपण एका नविन अभ्यासिकेची सुरूवात वरळी विभागात करत आहोत. आपणास माहिती असेलच की, समाजात ज्ञानाचे प्रकाश पसरवणारे एक सुंदर काम आम्ही हाती घेतले आहे. माता रमाई जयंतीच्या निमित्ताने जेतवन बुद्ध विहार, मायानगर (वरळी) येथे आम्ही एक नवीन ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थित आज होत आहे. .
“चला बुद्ध विहाराला ज्ञानाचे केंद्र बनवूया” या कमिशनर निखिल मेश्राम सरांच्या संकल्पनेच्या अंतर्गत, मुंबईतली ही चौथी अभ्यासिका सुरू होत आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात या चांगल्या पाऊलाची सुरुवात करायची आहे. कृपया आपण ही या व आपल्या आप्तस्वकियांना व मित्रांनाही घेऊन या.
कार्यक्रमाची माहिती खालीलप्रमाणे:
दिनांक: १० फेब्रुवारी २०२४
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
स्थान: जेतवन बुद्ध विहार, मायानगर कॉलनी, बी. जी. खेर मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८.
आपल्या उपस्थितीने निश्चितच या कार्यक्रमाला एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.
निमंत्रक
जेतवन बुद्ध विहार
संघमित्रा संघ
मायानगर-अचानकनगर (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.)
भिमोत्सव समन्वय समिती वरळी
राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत