आर्थिकखान्देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

चोरांच्या हाती चावी आणि मालक बिनधास्त!

लोकसभा निवडणूकीचा हंगाम सुरू झाला.आणि जिकडे तिकडे चोरांचे फोटो पेपरमधून झळकू लागले.ते पण फुकट नाही.तेथेही पैसाच लागतो.हा चोर आमचा.हा चोर तुमचा.आमचा चोर चांगला.तुमचा चोर वाईट.आमचा चोर धान्य साडी फुकट देतो. तुमचा चोर एक लाख फुकट देतो. कोठून देतो?आमच्याच कराच्या पैशातून.जो आम्ही रस्ता पाणी,वीज, गटार, आरोग्य,शिक्षण, संरक्षण साठी देतो. सांगा,आमचा चोर चांगला कि तुमचा चोर चांगला?म्हणून सांगतो,आमच्याच चोराला मतदान करा.

कांग्रेसने ४० कोटी याचक बनवले होते.भाजपने ८० कोटी बनवले.हम मुफ्त में देते है,और वो मुफ्त में खाते है.ऐसे लोग तो हमारी ही बात मानेंगे.असा प्रयत्न राजकीय पक्षांचा चालू आहे.
भारतात निवडणूक म्हणजे चोरांची मोठी ऑलिंपिक स्पर्धा असते.चोर संघटना आपले कुशल आणि ख्यातनाम चोर मैदानात उतरवत आहेत.येथे मतदार हा प्रेक्षक आहे.त्याला कळतच नाही कि,मीच खरा हम्पायर आहे‌.तो त्याचे अस्तित्व विसरला.आधिकार तर पेपर आणि टिव्ही ला देऊन मोकळा झाला.स्वताचा मेंदूचा वापर करणे था़ंबवून फक्त तोंडाचे भांडे वाजवतो.हा चोर चांगला कि तो चोर चांगला?
मी आधीच म्हटले कि राजकीय पक्ष म्हणजे व्हाईट कॉलर चोर पार्टी.असा अनुभव फक्त माझा नाही.सर्वांचा आहे.पण उघड बोलण्याचे धाडस लोक करीत नाहीत.सांगतांना सांगतात कि आम्ही महाराणा प्रतापसिंह चे वंशज आहोत‌.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत.पण प्रत्यक्षात कृती वरून तसे वाटत नाही.कदाचित स्वताची दुर्बलता,हतबलता लपविण्यासाठी तसे सांगत असतील.पुतळा आड लपल्याने उन वारा पाऊस लागत नाही.मंदिरात लपल्याने पाप दिसत नाही.टिळा माळा घातल्याने गु़ंड वाटत नाही.
भारतातील राजकीय पक्षांनी सरकारी तिजोरीतून खूप जास्त पैसा चोरला.तो आता उघडकीस येत आहे.चोरी तर आधीपासून चालू आहे.एकाने बोफोर्स मधून चोरले‌.दुसऱ्याने राफेल मधून चोरले.आता तर यात राष्ट्रीयकृत बॅंक सहभागी करून घेतल्या.यापुढे बॅंकेत पैसा ठेवणे सुद्धा धोकेदायक आहे.आता पर्यंत पतपेढी बुडत होत्या.ठेवीदार वाऱ्यावर सोडले.आता राष्ट्रीय बॅंका सुद्धा बुडतील.सुरूवात झाली आहे.
समोर उमेदवार पाहाता असे दिसते कि राजू शेट्टी आणि बच्चू कडू सारखे दोन चारच जनतेचे उमेदवार आहेत.बाकी सर्वच चोर पार्टीचे उमेदवार आहेत.काही कठपुतली.काही शोभेची बाहुली.पक्षांचा अजेंडा तसाच आहे कि,आम्हाला सज्जन माणसे नकोतच.ज्यांचे जनतेशी काहीच सोयरसुतक नाही,असेच उमेदवार सर्वच पक्षांनी दिले आहेत.पेपर आणि टिव्ही याच चोरांची टिमकी वाजवत आहेत.
मला असे वाटते,लाचार,भिकार मतदारांमध्ये तर बदल शक्य नाही. पण हुषार, कर्तबगार मतदारच बदल घडवू शकतात.स्वातंत्र्याची लढाई सुद्धा बुद्धीमान आणि कर्तबगार लोक लढले होते.लाचार आणि भिकार लोक तर इंग्रजांचे घोडे खाजवत होते.
आज रोजी कांग्रेस आणि भाजप यांच्यात धोरणांचे धृवीकरण झाले आहे.त्यांनी दिलेला उमेदवार, त्यांनी निवडून आणलेला खासदार हा त्यांचाच गुलाम असतो. आपला प्रतिनिधी कधीच नसतो.तो त्या त्या मालकाच्या विरोधात चकार शब्द बोलणार नाही.खासदार हे पद जरी संविधानिक मोठे वाटत असले ,विधायक वाटत असले तरी ते आता पक्षाचे गुलाम झाले आहेत.विचारा उन्मेष पाटील,ए टी पाटील आणि रक्षा खडसेंना.तुम्ही कधी मोदी विरोधात बोलले आहेत का? पाळलेल्या प्राणी पेक्षा त्यांचे जास्त महत्त्व आणि अस्तित्व त्यांनीच नाकारलेले आहे.मग तो डॉक्टर, वकिल, इंजिनिअर,प्रोफेसर असला तरीही मोदी आणि राहुल गांधी विरोधात बोलणार नाही.कारण नेत्यांनी आपल्या खासदारांना चाबूक (व्हिप) दाखवून जरब मधे ठेवलेले असते.बाहेर पडला तर इडी लावून बेडीचा धाक दाखवला जातो.महाराष्ट्रातील तथाकथित मराठा सरदार,शिंदे आणि पवारांची अवस्था अत्यंत दयनीय करून ठेवली आहे.
पक्षाच्या नेत्यांना पैशांचे महत्त्व आहे,बुद्धीचे नाही.आणि मुख्य हेतू आहे,सरकारी तिजोरी लुटणे.ज्यात आम्ही मतदाता,करदाता कर देतो.या तिजोरीच्या चाबी चोरांच्या हाती सोपवणे आत्मघातकी ठरणार आहे.
आम्हाला आमचा उमेदवार,आमचा प्रतिनिधी,आमचा वकिल लोकसभेत पाठवणे आवश्यक आहे.हा देश तुमचा आमचा नागरिकांचा आहे.फक्त मोदी ,शहा ,राहुल गांधीचा नाही.फक्त पवार ,ठाकरेंचा नाही.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!