देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

भगवान बुद्धांची शिकवण भाग ४८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रथम खंडात ‘बुद्धांनी काय स्वीकारले’ या भागात म्हणतात,
बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य (the first distinguishing feature) असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू ‘मन’ आहे.

मन सर्व वस्तूंच्या अग्रभावी असते (सर्व वस्तूंत श्रेष्ठ आहे), ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले कि सर्व वस्तूंचे आकलन होते.

मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते.

ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार (culture of the mind).

बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरुन ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे.

जे जे वाईट आहे, वाईटाशी संबधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातून उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते.

ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुध्दी हे धर्माचे सार होय. (The cleaning of the mind is, therefore, the essence of religion).

बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय. (the avoidance of all sinful acts)

त्यांच्या शिकवणीचे चवथे वैशिष्ट्य असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्त्वांचे पालन करण्यात आहे. (the observance of the tenets of the religion)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.३०.१.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!