मुख्य पान

जयंत पाटील काँग्रेस वासी होतील काय?

ऍड अविनाश टी काले , अकलूज 
9960178213

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुनील जी तटकरे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत राव पाटील साहेब हे 4जून नंतर काँग्रेस आय पक्षात सामील होतील अशी बातमी जय महाराष्ट्र चॅनल वरून नुकतीच दिली आहे .
या बातमी नंतर त्यावर अनेकांच्या कमेंट आलेल्या असून यातील बहुतेक कमेंट ह्या भावनिक पातळीवर केल्या गेलेल्या आहेत .
आ जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षातील मातब्बर नेते आहेत , आणि पवार साहेब यांच्या नंतर तेच सिनियर आहेत .
पवार साहेबांच्या अतिशय विश्वासू नेत्या पैकी ते एक नेते आहेत ,
पण संसदीय राजकारणात अस कायम विश्वासू कोणी नसतं , आणि पवार साहेबांच्या मनात काय असते आणि त्यांनी कोणते डावपेच कधी टाकले आणि का टाकले ? याचा उलगडा त्यांच्या अतिशय जवळच्या माणसांना ही ज्ञात नसतो , आणि हाच खरा राजकारणाचा गुणधर्म आहे .
आचार्य ओशो यांनी त्यांच्या एका कथेत एक मुलगा त्याच्या वडिलांना राजकारणाचे धडे शिकवा म्हणून मागे लागतो , शेवटी वडील तयार होतात , आणि मुलाला घरावर चढण्यासाठी शिडी लाऊन वर चढवतात , आणि शिडी काढून घेऊन म्हणतात “उडी मार ,,,, मी तुला झेलतो ” मुलगा घाबरतो , पण वडील त्याला स्वतः वडील असल्याचे आणि मुलासाठी जीव ही फक्त वडील देऊ शकतात अस बरच प्रवचन देतात ,
शेवटी मुलगा वडीलावर विश्वास ठेऊन उडी मारतो , आणि नेमके वडील बाजूला सरकतात व मुलाचा पाय फ्रॅक्चर होतो,,,,,
मुलगा वडीलांच्या वर चिडतो , पण वडील सांगतात , तुझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी ती कृती आवश्यक होती ,,, राजकारणाचा पाहिला धडा आहे , वडीला वर ही विश्वास ठेवायचा नाही .
पवार साहेब आणि अजित दादा यांच्यात नेमके काय ठरले असावे ? हे कोणीच सांगू शकत नाही , पण ते नक्की ठरले आहे ,,,
विशेषतः जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी वेळी , गुरू कमोडिटी कडून तो खरेदी केला जाणे , आणि जरडेश्र्वर प्रा ली कंपनी ला तो चालवायला देणे यात , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने ज्या कंपनी द्वारे पैसा दिला ती कंपनी ही अजित दादा , त्यांच्या सुविद्य पत्नी , सौ सूनेत्रा पवार , पार्थ पवार, जय पवार , असे अख्खे कुटुंबीय आहे , आणि त्यांच्या भोवती ई डी चां फेरा होता ,
निवडणुकी नंतर ही आय बी द्वारे अजून त्याचा तपास सुरू झालेला आहे .
अजित दादा यांनी भाजपला निवडणुकीत साथ दिली नसती तर ई डी ने त्यांना क्लीन चिट दिली नसती .
आपण जर संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांची मुलाखत पाहिली तर या मुलाखतीचे दोन घटक महत्त्वाचे आहेत ,
एक समग्र पवार घराणे हे अजून ही एकात्मिक आहे , राजकारण आणि कुटुंब यात ते भेद करतात .
चार पिढ्यांचा विस्तार होऊन ही हा कौटुंबिक सलोखा जपण्यासाठी दिवाळी आणि इतर प्रसंगात ते एकत्रित येतात , राहतात , आणि आपला नात्यातील गोडवा व स्नेह जपून ठेवतात .
अजित दादा आणि त्यांचे कुटुंबीय यांचे पवार साहेब यांचेशी भावनिक नाते अस्तित्वात नाही असे आपण का समजायचे? ,
यांच्या पैकी कुणाला ही होणारा मानसिक , शाररिक त्रास हा समग्र कुटुंबीया साठी तितकाच वेदना दायी ठरला असता .
प्राप्त परिस्थिती त जे योग्य होते ते त्यांनी केले असावे असे अनुमान आपण काढू शकतो .
मनु स्मृती दहन करताना आ जितेंद्र आव्हाड यांचे कडून योग्य ती दक्षता आंदोलन काळात न घेतली गेल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ही फाडल्या गेल्या , तेंव्हा भाजप चे छावणी त अजित दादा चे माध्यमातून स्थिरावलेल्या भुजबळ साहेबांनी च आव्हाड यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला , ही बाब त्यांची आंतरिक एकता दर्शवते .
महाराष्ट्रातील लोकसभा मतदान फेऱ्या संपल्या नंतर , बारणे यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ने निवडणुकीत सहकार्य केले नसल्याचा आरोप केला होता ,
विखे पाटील यांच्या विरोधात योग्य उमेदवार नसल्याने आ निलेश लंके हे अजित दादा यांना सोडून पवार साहेबांच्या आश्रयाला गेले ,
यावरून हे सर्व सोईचे राजकारण ठरवून केले गेले असावे या बाबत माझ्या तरी मनात शंका नाही .
पण आ जयंत राव पाटील साहेब हे काँग्रेस आय कडे का जातील? याचे उत्तर ही यातच दडलेले आहे .
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्या चे चित्र निर्माण झाले , आणि पक्षाची सर्व शक्ती जयंत पाटील यांच्या हातात एकवटली , व तसे चित्र ही राजकीय पटलावर निर्माण झाले ,
अजित दादा , सुनील जी तटकरे , इत्यादी एका बाजूला तर सुप्रिया ताई सुळे , आ जितेंद्र आव्हाड , , जयंत पाटील , मेहबूब शेख , आ रोहित पवार हे दुसऱ्या बाजूला
एकवटल्याचे दिसले .
प्रवीण दादा गायकवाड यांनी “लेट्स अप” वर दिलेल्या मुलाखतीचा शेवट हा अजित दादा कडे घेऊन जातो
4जून नंतर अशी स्थिती निर्माण होईल की , भाजपा चे गोटात स्थिरावलेले भाजपाला सोडतील ,
आणि अजित दादा यांना शरद चंद्र जी पवार साहेब यांच्या कडे परतण्या शिवाय चां दुसरा मार्ग नाही , अस त्यांचं वक्तव्य आहे .
धनंजय मुंडे यांनी पवार साहेबांच्या बद्दल बोलताना असे खुलासे केले होते , आणि अजित दादा यांनी ही तेच आरोप केले होते की
महाराष्ट्रात 2019 चे विधान सभा निवडणुकी नंतर पवार साहेब भाजप समवेत जाऊन सरकार बनवणार होते .
अर्थात शिवसेनेला बाजूला ठेऊन ही कृती केली जाणार होती .
अगदी भाजप चे नेते व उप मुख्य मंत्री ना देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी ही तेच सांगितले होते .
पण हा भाग अर्धाच आहे ,
मुंबई येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने मला चर्चेत सांगितले की , सोनिया जी गांधी यांना भेटून पवार साहेब भाजपा समवेत जाणार होते ते (ट्रोजन हॉर्स )ऑपरेशन करण्यासाठी.
शत्रूचे गोटात लाकडी घोड्याच्या पोकळीत स्वतः ला दडवून त्यांचा सफाया करण्याची इंग्रजी कथेतील गोष्ट ,,,,
परंतु शिवसेनेच्या खा संजय राऊत यांनी अगोदरच सोनिया जी गांधी यांची भेट घेऊन टाकलेल्या डावपेच याने हा मनसुबा उधळला गेला , आणि शिवसेना काँग्रेस सह राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता बदल झाला .
खा संजय राऊत यांना भाजपा क्रमांक एक चां शत्रू का मानते याचे कारण यात आहे .
अजित दादा यांना बंड (कृत्रिम ) बंड करायला लाऊन पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सहानुभूती मिळवून दिली ,
आणि अजित दादा यांना घेऊन ही भाजपा मताधिक्य वाढवू शकली नाही ,,,
महाभारतातील युद्धात दुर्योधनाने स्वतः कडे भ श्री कृष्णाचे सैन्य घेतले.
तर अर्जुनाने भ .श्री कृष्ण घेतले .
तसे हे झाले ,
पवार साहेबांचे शिवाय ची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आत्त्मा नसलेली बॉडी,,,
म्हणूनच प्रफुल्ल पटेल असतील किंवा भुजबळ साहेब यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ची मते भाजप कडे ट्रान्स्फर झाली नसल्याची कबुली दिली आहे .
अश्या परिस्थितीत भाजपा फार काळ अजित दादा यांना सहन करणार नाही आणि अजित दादा यांना माघारी फिरावे लागेल .
पण त्यांच्या माघारी फिरण्याने जयंत पाटील साहेब , आणि महेबुब शेख यांच्या सारखे नेते अस्वस्थ होण्याचीच अधिक शक्यता आहे , आणि त्या नंतर या दोघातील संघर्ष शिखरावर पोहचेल ,
प्रादेशिक पक्षांची रचनाच अशी असते की इथे संस्थापक घराण्या भौवती ती सत्ता फिरत राहते , व या मुळे नेतृत्वाची स्वंतत्र क्षमता राखणाऱ्या नेत्या साठी फारशी अनुकूल नसते
या उलट राष्ट्रीय पक्षात राज्य पातळीवर जबाबदारी चे निर्वाहन करण्या साठी मात्तब्बर नेत्याची आवश्यकता भासते .
निवडणूक काळात काँग्रेस आय पक्षाला अशोक चव्हाण सारखे नेते सोडून गेलेले आहेत , आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी ही केंद्रात जाण्याची मानसिकता व्यक्त केली आहे , ती पाहता , ही संधी जयंत पाटील साहेब सोडणार नाहीत असे मला वाटते ,
म्हणून सुनील जी तटकरे साहेब यांनी केलेल्या विधानात मला सत्याचा अंश दिसून येतो आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!