
सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या स्थापनादिन सोहळ्यात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं देशाच्या जिवंत लोकशाहीला सशक्त केलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सामान्य नागरिकाला सुलभतेनं न्याय मिळावा यामध्ये तंत्रज्ञानाची मोलाची भूमिका आहे, तसंच भक्कम न्यायपालिका हा विकसित भारताचा आधारस्तंभ असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाचं नवीन संकेतस्थळ, संगणकीकृत अहवाल यंत्रणा, तसंच नागरिक केंद्रित उपक्रमांचा प्रारंभ झाला न्यायालयाच्या कामकाजात तंत्रज्ञानामुळे अधिक पारदर्शकता आली आहे, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यावेळी सांगितलं. देशात वेगाने सामाजिक बदल होत असून न्यायपालिकेत महिलांचा सहभाग वाढत आहे, ही समाधानाची बाब असल्याचं ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत