किती अभिमान वाटतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल…

आत्ताच टीव्हीवर एका घटना अभ्यासकाने सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत SC च १५ % आणि ST च ७ % आरक्षण कमी करता येणार नाही. त्याला धक्काही लावाल तर तो घटनेचा अपमान असेल व ते कोर्टात टिकुच शकणार नाही.
कुठले लाखांचे मोर्चे नाहीत, स्वत:ची अशी म्हणायला सत्ता नाही. जे सत्तेमध्ये तेही आपले विरोधक आणि जे सत्ता उलथवायला निघालेत तेही विरोधकच. ना पैसा, ना कुणाची साथ. समाजाचे समर्थन भेटायला समाजात शिक्षण पण नाही. झोपलेला समाज आणि त्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी संपुर्ण विरोधी ताकदीनिशी एकटा लढणारा हा एक माणुस. आणि त्यातही स्वतः अस्पृश्यतेचे चटके झेलतोच आहे. कस सहन केल असेल आणि खरच कसा लढला असेल.
आज मराठा समाजाकडे सर्व ताकद असताना आरक्षण मिळवता येईना आणि त्या काळात या माणसाने प्रतिकुल परिस्थितीमधे अस आरक्षण दिलंय कि आज ६०-७० वर्षांनी सुध्दा त्याला हाथ लावता येणार नाही.
किती मेहनत घेतली असेल हो. शब्दांमधे वर्णन नाही करता येत नाही पण नुसता विचार केला तरी डोळ्यात पाणी येतय.
आणि आपण????
खरचं त्यांना जसा पाहीजे होता तसा समाज ऊभा करु शकलो का? प्रयत्न तरी करतोय का? सरकार आपल नाही म्हणुन ओरडत बसलोय़़ पण त्यांनी त्या काळी कस केलं असेल?
आज खरच त्यांच्या फोटोकडे बघुन स्वतःच्या क्रृतघ्नपणाची जाणिव होतेय. काय करु शकलो आपण त्यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी?
पण आजपासुन एक नक्की….
यानंतर मी रोजच्या जिवनातुन रितसर थोडातरी वेळ काढुन तो वेळ पुर्णपणे आंबेडकरी विचार वाचण्यात, समजून घेण्यात व प्रचार करण्यात घालवेन आणि सामाजिक चळवळीमध्ये मुठभर का होईना काम करण्यात, बाबासाहेबांच राहीलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खर्च करेन.
त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेला आणि कार्याला हात जोडुन वंदन.
Thank you Babasaheb तुम्ही आम्हाला जे दिलयं त्यासाठी.
शेवटी…
“ऊद्धरली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे.” हेच सत्य आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत