देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती – एस जयशंकर…

नायजेरिया मधल्या भारतीय समुदायाशी ते काल संवाद साधत होते. भारतात गेल्या दशकात झालेले पाच महत्वाचे बदल त्यांनी अधोरेखित केले. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती देताना परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल रोखरहित व्यवहारांचं उदाहरण दिले.अमेरिकेत तीन वर्षांत होणारे रोखरहित व्यवहार भारतात एका महिन्यात होतात असं जयशंकर म्हणाले. आव्हानांकडे बघण्याची,त्यांचा सामना करण्याची पद्धत,सामान्य भारतीय नागरिकांच्या जीवनमानात झालेले परिवर्तन आणि जगातल्या इतर देशातल्या लोकांची काळजी घेण्याची उदारता याचा त्यांनी उल्लेख केला.कोविड काळातल्या भारताच्या वाटचालीचे त्यांनी उदाहरण दिले. तत्पूर्वी त्यांनी अलिप्त राष्ट्रांच्या १९ व्या शिखर परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आणि संयुक्त राष्ट्रांचे सचिव अॅंतोनिओ ग्युटरेस यांची भेटही घेतली. भारत–नायजेरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीमध्ये हजर राहण्यासाठी जयशंकर सध्या नायजेरियाच्या दौऱ्यावर आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!