
डॉ.अनंत दा. राऊत
धर्माचा खरा कल्याणकारी अर्थ स्वीकरायचा असेल, तर मंदिर,विहार, मस्जिद,चर्च,गुरुद्वार इत्यादींमध्ये किंवा कोणत्याही कर्मकांडांमध्ये सत्य व सकलजन कल्याणकारी धर्म नसतो, तर माणसाने माणसाशी व सजीव सृष्टीशी हितकारक रीतीने कसे वागावे या संदर्भात दिलेल्या नैतिक नियमांचे तंतोतंत पालन करण्यात खरा धर्म असतो. अशा नैतिक मूल्यांच्या तंतोतंत पालनाकडे सर्वच धर्माचे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात आणि निरर्थक कर्मकांडी धर्माला कवटाळत आपण फार धार्मिक असल्याचा डांगोरा पिटतात. म्हणूनच भारतात आणि जगात देखील कर्मकांड केंद्री धर्म हा सकलजन कल्याणाचा, माणसाला माणसाशी जोडण्याचा दुवा न ठरता परस्परांना परस्परांपासून तोडणारा, द्वेष करायला लावणारा व भांडायला लावणारा घटक बनतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत