मनू कडे परत चला..

शिवाजी राऊत सातारा 13 जानेवारी 23 वेळ 9.15
भारतीय समाजाच् आजचे अस्वस्थ व उध्वस्त जगणे पाहिले म्हणजे अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे प्रश्न समोर येतात समाज एक व्यापक गोष्ट आहे समाजाच्या जगण्याला सामाजिक न्यायाची पायाभूत रचना आणि गरज कायम असते राजकीय सामाजिक धार्मिक अध्यात्मिक अशा संमिश्र आकांक्षा बाळगत पुढे निघालेला हा भारतीय समाज हा बहु सांस्कृतिक वर्चस्व भूमिकांच्या अतंस्थ जतन हेतु मुळे. तो वर्ग विग्रहवादी कधीच होऊ नये असे स्वातंत्र्यप्राप्तीपासूनचे प्रयत्न इथे चालू आहेत ती उद्दिष्टये या क्षेत्रातील अनेकांची हो ती असे आज निरीक्षण नोंदवता येते .याचे कारण असे की राजकीय क्षेत्र हे ज्या कल्पनांवर बेतलेले आहे त्या कल्याणकारी उद्दिष्टांची भाषा बोलली जात आहे ती भाषा मायावी व दैव कर्म पूर्व संचित समर्थांना ची आहे बहुसंख्यांना आम्हाला हे शोषित जीवन जगण्यासाठी ईश्वराने इथे पाठविले आहे हा कर्माचा खेळ आहे त्यामध्ये अमुलाग्र बदल अभिप्रेत नाही जुजबी विकास करीत राजकारण करणारे राजकीय पक्ष हे सामाजिक न्यायासाठी काम करतात
करतीलअसा भान बाळगणे फार मोठी फसगत आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कल्पना आणि राजकारण समाजकारण आणि कल्पना याचा शोध स्वातंत्र्यपूर्व अनेक प्रकारे घेण्यात आला आहे त्या काळात खेड्याकडे परत चला आणि मनु कडे परत चला या दोन विचारधारांच्या परिशीलनातून हा शोधातून घेता येतोशोषित समाज व्यवस्था जैसे थे ठेवून भारताच्या उद्याच्या स्वातंत्र्य उत्तर काळात आध्यात्मिक साम्यवाद आणू पाहणारे लोक कोण होते? हे तपासले पाहिजेत सरंजामी समाजवाद आग्रह धरणारे लोक कोण होते?भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात वर्ग विग्रहाच्याबद्दल खूप चर्चा झाली नाही आध्यात्मिक अवशेष सरंजामी अवशेष जर विषमता कायम ठेवून हा देश निर्माण करून पाहणारे लोक समाजवादी विचार धारा समर्थक होते हे गांधीजींच्या कोणत्या विचारधारेची प्रस्थापना करू पाहत होते? हे भारतातील जनसामान्यांना व्यक्ती उद्दातिकरण प्रभाव यामुळे हे कळाले नाही व्यक्तित्वाचा आदर यामध्ये स्वातंत्र्य आंदोलन अध्यात्मिक साम्य वाद की सरंजामी समाज वाद या पैकी निश्चित कोणता मार्ग स्वीकारावा या दिशेने वाहत गेले यामध्ये सादर केलेल्या कल्पना सास्कृतिक राष्ठवाद स्वातंत्र्य हि धूर्त हिंदू राष्ट्र वादी राजकीय कल्पना होती या तिन्ही राजकीय कल्पनांचे दिशांत् र भिन्न होते हा उत्तर काळातील साकारण्यात येणारा नवा भारत हा शोषणमुक्त असेल म्हणजे काय ?सत्ता संपत्तीचे फेरवाटप न होता हा शोषण मुक्त भारत करण्याची भाषा बोलणारे लोक व शोषक सरंजाम हे गांधीजींच्या नेतृत्वाचे आधुनिक भारताचे गौरवीकरण करण्यात गुंतले होते गांधींच्या अहिंसक राज्यक्रांतीमुळे नवनिर्माणाचा भारत हा खेड्याकडे परत चला मनू कडे परत चला वर्गवि ग्रहाकडे जाऊया या तीन भूमिका मुळे जनमनाच्या आंदोलन भूमिका च्या पातळीवर दुभंगलेला स्वातंत्र्य काळातील भारत होता मनु कडे परत चला म्हणणारे लोक हे स्वातंत्र्याच्या क्रांतीला सांस्कृतिक वादाकडे नेत असताना जनमन तयार झालेले नाही सांस्कृतिक भूमिकांची मांडणी अत्यावश्यक आहे या जाणिवेने सावध व्हा वर्तन करत होते राजेशाहीचा स्वातंत्र्य काळातील सहभाग त्या स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांचा प्रभाव या सर्वच भूमिकांच्यामुळे मनु कडे परत झाला की हाक प्रभावी ठरली नाही ती व्यक्त झाली नाही ती सुप्त राहिली ती वर्णव्यवस्थेतील तीन वर्णनांना आकृष्ट वाटली नाही हे वास्तव आहे सरंजामी समाजवाद आणि खेड्याकडे परत चला हे दोन्ही एकत्रित राजकीय संदेश आणि वास्तव हे भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात तब्बल चार दशके प्रभावी होते यांनी वर्ग विग्रहाच्या भूमिका व वर्गीय जाणिवांचे रूपांतर होऊ नये याची काळजी सतत घेतलेली आहे थोडक्यात समाजवादाच्या पाश्चात्य जडवादाची मांडणी करण्यामध्ये हे विचारवंत हे कार्यकर्ते व्यस्त होते त्यामुळे सरंजामी समाजवादी शोषण व्यवस्था अबाधित ठेवणे वर्णव्यवस्था मान्य करणे ती टिकवण्यासाठी जन्म अनुकूल तयार करणे हे समाजवादी अपूर्ण प्रयत्न चालू होते ते नव साक्षर शोषितांना करणे अवघड होते मुळात सरंजामी समाजवादी चे दोन रंग होते एक वर्णीय भांडवलशाही व दुसऱ्या बाजूला समाजात प्रभुत्व गाजवणारी क्षत्रिय वंशवादी सरंजाम शाही या दोन्हींना चुचकारत या दोन्हींची मर्जी सांभाळत सरंजामी समाजवादी हे संपूर्ण स्वातंत्र्याची संकल्पना मांडत होते ही कल्पना पूर्ण स्वराज्य या दिशेने जाईल या सगळ्या राजकीय कल्पनांचा दुसर प्रवास हा एक भ्रम होता हा एक अध्यात्मिक साम्यवादाला चालवलेला विरोध होता व या विरोधांतर्गत वर्ग विग्रहाचा लढा स्वतः संपत्तीच्या फेरवाटपाचा लढा हा सशक्त होऊ नये तो वर्तमानाच्या व्यवस्थेला आव्हान देऊ नये याची काळजी त्या काळात घेतली जात होतीस्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेली राजवट ही धर्मनिरपेक्ष समाजवादाची भाषा बोलत होती आचरण मात्र करत नव्हती त्यामुळे धर्मनिरपेक्षित तिची साक्षरता पुढे गेली नाही समाजवादाचे सैद्धांतिक विश्लेषण सर्व दूर भारतात पोहोचले नाही आणि सरंजामी अवशेषाची धूर्त समाजवादी पाऊस आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची मनुकडे परत झाला ही फौज आतून हात मिळवणे झाल्याने ती एकत्र चालत होती आणि त्यामुळे शोषणाविरुद्ध आव्हान देणे व्यवस्थेच्या बदलाची नारे देणे या पातळीवरही संपूर्ण भारत भावनिक पातळीवर शोषणाविरुद्ध उभा राहू दिला नाही हे मनु कडे परत चला यांच्या पथ्यावर पडलेखेड्याकडे परत चला हा महात्मा गांधीजींचा पर्यायी विकास निधीचा नैसर्गिक साधनाचा मर्यादित वापर करणारा विचार ग्राम स्वराज्याच्या उद्दिष्टाची स्वप्न पाहत होता तो सत्य प्रेमाची भाषा बोलत होता पण सत्य प्रेम आणि उद्दिष्टे यांची वास्तवता गांधी हत्यानंतर निर्माण करण्यामध्ये यश आले नाहीयाचे कारण कल्पनांचे गारुड हे अध्यात्म कडे जाते कल्पना अध्यात्मिक रुजतात त्यामुळे कोणत्याही मांडलेल्या नव्या राजकीय कल्पनांची अपरिहार्यता व वास्तवता ही स्पष्ट करून आंदोलकांना सांगावी लागते भारतीय स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये खेड्याकडे चला व मनु कडे परत चला या दोन्हीही कल्पना ची वास्तवता स्पष्ट करून दाखवण्यात दोन्ही पातळीवर अपयश आलेल्या आग्रह वाढले परंतु कल्पनांचे फोल पण दाखवून देण्यामध्ये सर्वांना अपयश सतत आलेले आहे मानवता वादाची कल्पना ही नेहमी पारंपरिक वैभव वाढवते मानवतावाद स्त्री-पुरुषांना भावनिक एकत्रित करतो मानवतावाद हा मनु कडे परत चला या कल्पनेला विरोध करतो मनुकडे परत चला ही घोषणाच मानवतावाद विरोधी आहे असे असताना रुढी विध्वंस न करता संस्कृतीची बंधने न तोडता मानवता वादाच्या कल्पनेचा वास्तव अनुभव जगभर कुठेच कोणा समाजास प्राप्त झालेला नाही भारतरत्न सत्य प्रेमाची अपरिग्रहाची विश्वस्त वर्तनाची खेड्याकडे चला ही हाक मानवतावाद साकारणारी पूर्णतः ठरत नाही कारण शोषक आणि शोषित यांचा वर्ग वास्तवाचा अवशेष असाच कायम ठेवून खेड्याकडे परत चला या घोषणाचे मूर्त स्वरूप स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साकारलेले नाही हे आता मान्य करावे लागते या उद्दिष्टांचा प्रयत्न प्रमाणिक होता यातील व्यक्तींच्या निष्ठा थोर होत्या या उद्दिष्टासाठी जीवन जगलेल्या वृत्तस्त अनेकांचे जगणे वंदनीय मानावे लागते मात्र खेड्याकडे परत चला व मनू कडे परत चला या दोन राजकीय कल्पनांच्या मुळे अध्यात्मिक साम्यवादाचा पराभव उशीरक होईना भारतात झाला आणि सरंजामी अवशेष चा समाजवादी हा मनुकडे परत पूर्णतः केला असे आजचे भारतीय राजकीय वास्तव आहे म्हणून भारतीय राजकीय वास्तूला कल्पनांची चिकित्सा आणि वर्गविग्रहाचा प्राधान्यक्रम ठेवावा लागेल क्रांती अहिंसक असते हे अध्यात्मिक फसवणूक असते आध्यात्मिक साम्यवाद्यांची अर्थातच मनुवाद्यांची ती भूमिका असते अंतस्थ त्यांचे हेतू असतात हे भारतात घडले आहे वर्णव्यवस्था शोषण व्यवस्था या दोन्ही एकच आहेत वर्ण व्यवस्था आबादीत ठेवणे शोषण व्यवस्था अबाधित ठेवणे आणि साम्यवादाचा प्रवास यशस्वी होईल अशा राजकीय कल्पनेचा प्रवास इथल्या नाही रे वर्गाला करायला लावणे ही फार मोठी राजकीय फसगत इथे झालेली आहे हे घडत असताना वर्णवाद्यांच्या प्रयत्नातून विकसित झालेली भांडवलशाही हिने मात्र सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया मजबूत केला आणि लोकसत्ताक राष्ट्र निर्माणच्या प्रयत्नाला खिळ घातली हे आपणास 2023 मध्ये पाहत आहोत
भांडवलशाही ही शोषण आणि सशक्त होते वर्णवस्थेचा पाया मजबूत करते सांस्कृतिक आभास तयार करते इतिहासा ची पुनर मांडणी करते आणि सरंजामी इतिहासातील व्यक्तिरेखांच्या उदात्तीकरणाच्या गौरवात शोषित समाजाला अडकवते हे भारत देशी आता सर्वत्र घडत आहे ते आजचे वर्तमान आहे म्हणून मनु कडे परत चला ही हाक ऐकणारे कोट्यावधी भारतीय या सांस्कृतिक सापळ्यात अडकत चालले आहे आणि स्वतःला शोषित अध्यात्मिक दैववादाची बळी स्वतः ते देत आहेत आणि वर्ग विग्रहाचे लढे पराभूत होत आहेत या सर्वांची कारणे राजकीय कल्पनांचे आभासीकरण करण्यामध्ये सांस्कृतिक मूलतत्त्ववादी अर्थातच मनुकडे परत चला असे हाक देणारे व सरंजामी समाजवादी अवशेषाचे जतन करते हे एकत्रितपणे भारताला शोषित समाजाचा अवकाश कायम बनवत आहेत हे भारताचे आजचे राजकीय गतिरोधाचे वास्तव आहे अध्यात्मिक साम्यवादी हे वर्गविग्रहाचे लढे गतिमान करीत असताना ते हिंसेच्याद्वारे डॉक्टर मानवेंद्रनाथ राय यांनी 1944 मध्ये म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश कालीन 124a या कलमाच्या आधारे वर्गविगृहवादी चळवळी कार्यकर्ते यांना तुरुंगात अडकून ठेवणे हे मनु कडे परत चला यांचे प्रधान कार्य बनले आहे आणि भारत हा राजकीय कल्पनांचा पराभूत देश ठरतो आहे असे खेदाने नमूद करावे लागते आहेसारांश रूपाने असे म्हणता येते की आध्यात्मिक साम्यवादी हे सुद्धा सांस्कृतिक विग्रहाच्या विरोधात उभे राहूच न शकल्याने ते सतत पराभूत होत आहेत शोषित वर्गांना राजकीय कल्पनांच्या आभासात अडकवण्यामध्ये मनुकडे परत चला असे हाक देणारे यशस्वी होत आहेत आणि हा देश पुन्हा वर्णवादी व सरंजाम हे नव हिंसावादी फासीवादी मनुवाद्यांच्या ताब्यात देश पुन्हा जातो आहे हे अटळ वास्तव मान्य करायला हवे हा निराशवाद नाही परंतु वर्गविग्रहाचे लढे उभे राहत नाहीत ते वास्तव राजकीय कल्पनांच्या आधारे आरेखित केले जात नाहीत म्हणून मनुकडे परत चला लोकसत्ताक राज्यव्यवस्था अशा विसंगत संभ्रमानेच पुढे चालत राहील सांस्कृतिक पुनर्जीवन वाद यशस्वी होतं चालला आहे असे दिसून येते म्हणून खेड्याकडे परत चला हा गांधी प्रणित पर्यायी विकास निधीचा राजकीय कल्पनेचा नवनिर्माण प्रयत्न भारत देशी चालल्याचे आढळत नाही आणि दुसऱ्या बाजूला मनुच्या हाकेला ओ देणारे शूद्र ती शूद्र हे जनसमूह शोषितांचे तांडे म्हणून हिंसेच्या कराल जबड्यात इतिहासाच्या पुनरावृत्तीत स्वतःलाच समाविष्ट करीत आहेत हे नाकारता येत नाही म्हणून चला परत चला खेड्याकडे परत चला ही नवी हाक वर्ग विग्रह विग्रह वादी चळवळींच्या पुनर्बांधणीची ऐकण्यातच भारताचे लोकसत्ताक राज्य वास्तवाकडे नेता येईल असे अनुमानित करता येते एवढेच
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत