देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

अडाणीचा नवा डाव !

स्टेट बँक , २५००० शाखांचे प्रचंड जाळे , दुर्गम भागात पोहोचलेले ग्राहक सेवा केंद्र आणि एटीएम चे जाळे, ४८ लाख कोटींची मालमत्ता. सरकारच्या सगळ्या योजना राबवण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधा असलेली भारतातली सगळ्यात मोठी बँक ! २०१५ ला बँकिंग परवाना मिळालेल्या जिओ पेमेंट बँकेसोबत स्टेट बँकेने सामंजस्य करार केलेला आहे. हा करार करताना स्टेट बँकेच्या अध्यक्ष होत्या अरुंधती भट्टाचार्य ( त्याच त्या, शेतकरी कर्जाने अर्थव्यवस्था गाळात जाते म्हणणाऱ्या ! ) त्या निवृत्त झाल्यावर रिलायन्सच्या संचालक मंडळात जाऊन बसल्यात !! कसे लागेबांधे आहेत , बघा ! आता नवीन बातमी !!२५००० शाखा , ४८ लाख कोटींची मालमत्ता असलेली स्टेट बँक आपल्या अडाणी भाऊच्या ‘अडाणी कॅपिटल’ या कंपनीसोबत सामंजस्य करार करतेय ! अडाणी भाऊच्या या कंपनीच्या शाखा आहेत ६३ आणि मालमत्ता आहे फक्त रुपये १२९२ कोटींची !! कशासाठी ? तर कृषी कर्ज वितरण करण्यासाठी !!हे कृषी कर्ज वितरण करायला स्टेट बँकेचे मनुष्यबळ , शाखांचे जाळे , अनुभवी कर्मचारी पुरेसे नाहीत का ? असे “अडाणी प्रश्न” विचारायचे नाहीत !!शेतकरी कायदे माघारी घेतल्यावर अडाणी भाऊच्या कंपन्यांचे नुकसान झालेय ना ! या झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करायची आणि शेतकऱ्यांची मान कशी पिरगळता येईल याची तरतूद नको का ? मग अडाणी कॅपिटल स्टेट बँकेच्या नळाला तोटी सोडायला बसली तर कुठल्या शेतकऱ्याला , कुठल्या राज्याला , कुठल्या प्रदेशाला , कुठल्या पिकाला किती कर्ज द्यायचं, द्यायचं कि नाही द्यायचं हे कोण ठरवणार ? तर अडाणी कॅपिटल !!अडाणी ऍग्रो लॉजीस्टिक आधीच आलेली आहे. या कंपनीने देशभरात विशेषतः हरियाणा पंजाब राजस्थान मध्ये मोठमोठी लोखंडी गोदामे उभारली आहेत. शिवाय खाजगी रेल्वे लाईन टाकलेली आहे. त्यांना शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन साठा करायचा आहे व भाव वाढल्यावर विकायचा आहे !!आता ज्यांना कर्ज हव आहे त्यांनी माल कुठे विकायचा, कुठल्या गोदामात ठेवायचा याची बंधन स्टेट बँकेच्या वतीने अडाणी कॅपिटल कंपनीने घातली गेली तर काय होईल ? कृषी कर्जाच्या नावाने याच कॉर्पोरेट कंपन्यांच्या गोदाम , शेतमाल साठवणूक आणि प्रक्रिया करणाऱ्या अतिप्रचंड कारखान्यांना कर्जे वाटली तर काय होईल ? स्टेट बँके ही अजूनही भारतात सगळ्यात भक्कम जाळ असलेली बँक असून ग्रामीण भागात सरकारच्या सगळ्या योजना पोहोचवायला कामाला येत असते. पन्नास एक वर्षांपूर्वी जनतेचे व शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. परंतु स्टेट बँक व अडाणी कॅपिटल यांच्यातील हा सामंजस्य करार नेमका या उद्देशाच्या उलट आहे. हा देश सरकार चालवत आहे , हा भ्रम डोक्यातून काढून टाका. हा देश सरकारचे बाहुले ज्यांच्या मांडीवर बसलेले आहेत तेच मालक चालवत आहेत ! इथेच बजेटचा व त्यातील आपल्या हिश्श्याचा मुद्दा लागू होतो !! सरकारचे प्रतिनिधी फक्त कळसूत्री बाहुल्या आहेत. हा इस्ट इंडिया कंपनीचा आधुनिक भारतीय अवतार आहे. बाकी लोकांनी या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करावे म्हणून मिडिया तत्पर आहेच. आपण भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लीम, यासारखे तुकडे रोज रवंथ करायचे…. जनावरांसारखे ! वेलकम टू न्यू इंडिया !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!