एक ज्योत ज्ञानज्योतीसाठी ठीक ६ वाजता…

निमंत्रक
अरुण विश्वंभर जावळे
९८२२४१५४७२
सर्व अनर्थांचे मूळ अविद्या आहे. अविद्येने अपरिमित असे नुकसान होते, हे जाणणाऱ्या आद्य जाणत्या शिक्षिका सावित्रीबाई फुले. ३ जानेवारी ३१ ला त्यांचा जन्म सातारा येथील नायगांव या गावी झाला. भारतभूमीत खऱ्या अर्थाने समाजक्रांतीचा पाया ज्यांनी रचला त्या जोतिराव फुले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.
जोतीरावांच्या विचारांची मशाल पुढे घेऊन जाण्यासाठी त्या स्वतःच परिवर्तनाचा जाळ बनून पुढे सरसावल्या. व्यवस्था बदलासाठी त्यांनी अवघे आयुष्य पणाला लावले. जोतीरावांच्या निधनानंतरही परिवर्तनाचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले. प्लेगच्या संकटात स्वतःच्या जीवाची चिंता न करता लोकांना वाचविण्यासाठी त्या धडपडत राहिल्या.
खरेच, हे फुले दाम्पत्य जर महाराष्ट्रात जन्मले नसते तर आज महाराष्ट्र शंभर वर्षै मागे राहिला असता. युगायुगातून एकदाच अशी माणसे जन्माला येतात. सावित्रीबाई म्हणजे एका अर्थाने मदर इंडिया. त्यांच्या जयंतीनिमित्त या मदर इंडियास विनम्र महाअभिवादन करण्यासाठी बुधवार दि ३ जानेवारी रोजी ठीक सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्रत्येकाने एक मेणबत्ती प्रज्वलित करावयाची आहे. कोणा एकाच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हा अभिनव कार्यक्रम असणार नाही तर विविध पुरोगामी संघटना, गटतट यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाअभिवादन असणार आहे. तेव्हा ठीक सहा वाजता पुतळा परिसरात उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत