मानव अधिकारापासून वंचित असणारा समाजात जागृती निर्माण करून मानवी अधिकारासाठी आंदोलन करण्यास परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा पुकारला.

विनायकराव जामगडे
7823093556
9372456389
मानव अधिकारापासून वंचित असणारा समाजात जागृती निर्माण करून मानवी अधिकारासाठी आंदोलन करण्यास परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा पुकारला.
लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन निष्ठेने संघटनेत काम करित स्वाभिमानाने जीवन
जगण्यास सुरवात केली.
अशिक्षित असूनही बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ समजून ती पुढे नेण्यास आपल्या परिने मदत करून संघटित होऊन संघर्ष करीत ….
आपल्या संघटित शक्तीने समाजात धाक निर्माण करून आपल्या मानवी अधिकारांचा वापर करून समता प्रस्थापित करण्यासाठी जनजागृतीची मशाल पेटवून समाजात असणारा अज्ञानरूपी अंधकार.नष्ट करून समाजातील शोषण अस्पृश्यता दूर करण्यासाठी चळवळीला मजबूत करीत
बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. अर्ध्या पोटी राहा परंतु मुलाला शिक्षण द्या लोकानी ह्या आदेशाचे पालन केले मोठ्या प्रमाणात एक पिढी शिक्षण घेऊन अधिकाराच्या जागा काबीज केल्या.
अधिकारी समाजाच्या हिताचे संरक्षण करून गरीब जनतेला गरीबीतून वर आणण्यासाठी मदत करतील ही अपेक्षा होती. परंतु शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेलेला समाजापासून फटकून राहू लागला.त्याच्या अधिकारावर आच आली तर त्याला समाजाची आठवण येते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत पोलादी संघटना ऊभारली.समता स्वातंत्र्य समान न्याय समान संधी हे जीवनमूल्ये रूजविले.
मजूर शेतकरी व स्त्रिया वर होणा-या अन्याय अत्याचार विरूद्ध संघर्ष करून न्याय मिळवून दिला.
भांडवल शाही व ब्राम्हणशाही विरूद्ध लढण्यास लोकाची मने तयार केली. शोषणरहित समाज निर्माण करणयास प्रवृत्त केले.व्यवस्थेला घाम फोडला. व्यवस्था घाबरली.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला कमजोर करण्याचा प्रयत्न केला काही कार्यकर्त्याना फोडण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.एखादा नादी लागला तर त्याला समाज बहिष्कृत करून त्याचे बेहाल करीत . म्हणून कोणीही हिमत करीत नसे.एकजुटता कायम होती. विरोधी पक्षाच्या लोकाची हिमत होत नव्हती आंबेडकरी समाजाचे मोहल्यात जाणयाची.हरिजन असला तरी समाजापासुन दूर राहत असे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तालमीत तयार झालेल्या कार्यकर्ते सत्तेचा मोहाला बळी पडले.लोकशाही मूल्यांचा विसर पडून एकमताची कार्यप्रणाली सुरू झाली. सघटनेचे तुकडे होऊन विसघटित झाली.वचक कमी झाला.पूर्वि सघटधना सोडुन गेला तर समाज त्याचा समावेश करीत नसे परंतु आज फुटीरवृतीच्या लोकांचा बोलबाला आहे.आपल्या सर्वार्थासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा व निळ्या रंगाचा दूरोपयोग केला जात आहे समाजापुढे प्रश्न आहे की कोणाचे ऐकावे.कारण प्रत्येकजण म्हणतो की मी आबेडकरवादी आहे.मीच चळवळ पुढे नेत आहे.मलाच सर्व तत्वज्ञानाचा अभ्यास असून मी सागतो तोच आबेडकर वाद आहे.व तीच चळवळ आहे.ही संभ्रम अवस्था आहे त्यामुळे राजकिय सामाजिक सांस्कृतिक स्तरावर फुटीरता दृष्टिस पडते.विषमतावादी संघटित असून ते जात व्यवस्था मजबूत करीत आहेत.आपली सत्तेची मूठ मजबूत बाधत आहे सरकारी मालमत्ता भांडवलदारांच्या घशात घातले जात असून खाजगीकरन वाढत आहे.आरक्षण मोडीत काढीत आहे.लोकशाही धोक्यात आली आहे. धार्मिक उन्माद वाढत आहे.अश्यावेळी लोकशाहीचे संरक्षण करणार्यांनी एकजूट बांधून व्यवस्थे सोबत संघर्ष करण्याची गरज आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत