नपुंसक मेंदूच्यानो


हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मोठ्या परिश्रमाने आपल्या बुद्धी चातुर्याच्या भरोशावर आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची भर टाकून भारतातल्या सर्व नागरिकांना धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी अशी मूल्ये भारतीय संविधानात न्यायिक समतेवर त्यांनी प्रदान करून मोलाची कामगिरी बजावली. हे त्यांचे उपकार आणि ऋण आपण फेडू शकणार नाही. ते म्हणतात -
हिंदुस्थानात लोकशाही यशस्वी करायची असेल तर लोकांनी आणि शासन संस्थांनी विशिष्ट संकेत आणि नीती पाळली पाहिजे
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं. 469 पैरा – 2.
तसेच भारतीय लोकशाही स्थापित आहे पण लोक नपुंसक मेंदूची अक्रियाशील व्यक्ती कशी आहेत याबद्दल त्यांचे मत जाणून घेऊया ते म्हणतात –
ह्या देशात लोकशाही आहे. परंतु त्या लोकशाहीने आपली बुद्धी चालविण्याचे स्थगित केली आहे. तिने आपले हातपाय एकाच पक्षाशी जखडून ठेवले आहेत. त्या पक्षाचे विचार आणि त्याची कृती याविषयी कठोर चिकित्सा करून न्यायनिवाडा करण्याची तिची तयारी नाही. माझ्या मते हे मोठे दुखणे आहे, तो एक रोग आहे , मोठे आजार पण आहे. त्या रोगाने आपल्या सर्व लोकांना पछाडले आहे. त्याने ते बधीर झाले आहेत. मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी की , ” हिंदी लोक परंपरेने बुद्धिवादी नसून अतिरिक्त श्रद्धाळू वृत्तीचे आहेत. जो सर्वसामान्य माणसाहून विक्षीप्तपणे वागतो आणि तो ज्या विक्षीप्त वागण्यामुळे इतर देशात पागल ठरले तो या देशात महात्मा किंवा योगी ठरतो. आणि धनगराच्या पाठीमागून जशी मेंढरे जातात तसे लोक त्याच्या पाठीमागून जाऊ लागतात”
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं. 331 पैरा – 2.
तसेच -
संविधान लिहिणाऱ्या महामानवाने या देशात मनुस्मृति जाळली आहे..... ह्यात ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवा खातीर म्हणतात - माझ्या ठिकाणी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता आणि मनुस्मृति बद्दल क्रांती - प्रतीक्रांती मधील विचाराबद्दल म्हणता येईल -
मनुस्मृती ही निश्चितच स्त्रियांना दृश्यरित्र, व्यभिचारी पुरुषांची गुलाम ठरविणारी आहे. मनुस्मृतीची निंदा करून समाधान झाले नसते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले
मनुस्मृति मध्ये अध्याय " 9/14 , 9/15 , 9/16 तसेच 2/213 , 2/214 आणि 2/215 " मध्ये सुद्धा स्त्रियांना व्यभिचारी घोषित केले आहे. याचा उल्लेख डॉ. बाबासाहेबांनी क्रांती - प्रतिक्रांती या ग्रंथात पृष्ठ. क्रं. 217 आणि पृष्ठ. क्रं. 90 मध्ये केलेला आहे संदर्भ पहा -
मौर्याच्या बौद्ध राज्याच्या विरुद्ध क्रांती करण्यासाठी पुष्पमित्रानेच " मनुस्मृति " मधील आचारसंहिता लावली या शंका उरत नाही. मनुस्मृती ही ब्राह्मणशाही वर आधारलेली असल्याची पुष्पमित्राची क्रांती हा त्याचा पुरावा आहे. केवळ पराक्रम गाजविणे हा पुष्पमित्राचा हेतू नव्हता. हे मनुस्मृतीचे संबंधित श्लोक काळजीपूर्वक वाचल्यावर दिसून येते
संदर्भ – क्रांती – प्रतीक्रांती. पृष्ठ. क्रं. 39 व पृष्ठ. क्रं. 41 मधील पहिला व दुसरा पैरा.
पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचा कालावधी, निष्कर्ष काढताना म्हणतात -
मनुच्या कालावधीच्या बाबतीत मी जे काही संदर्भ दिलेले आहेत त्यावरून इ. स. 185 मध्ये सुमती भार्गव यांनी मनुस्मृती लिहिल्याचे दिसून येते म्हणजेच पुष्पमित्राच्या क्रांतीनंतर होय. या विषयावर अधिक काही मत व्यक्त करण्याची गरज वाटत नाही
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 5. ब्राह्मण शाहीतील वांग्मय.खालून दुसरा पैरा.
भारतातील महागाई , बेरोजगारी यांनी आग ओकली आहे आणि समाजातील भाडोत्री पुढाऱ्यांनी अमिषा पोटी भडवेगिरी करून सत्ताधारी ब्राह्मणशाही संघाच्या गोठ्यात समाजहित न जोपासता मुसके लावून सामील झाली आहेत ते नपुंसक झाली त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनात चीड आणि राग आणून म्हणतात -
ज्या पुरुषाला अन्यायाचा राग येतो व जो अपमान सहन करीत नाही तोच खरा पुरुष म्हणायचा. ज्या पुरुषाला राग किंवा चीड येत नाही तो आणि नपुंसक सारखेच
संदर्भ – खंड. 08 पृष्ठ. क्रं. 76.
उपरोक्त संदर्भानुसार समाजातील भाडोत्री पुढारी यांनी भडवेगिरी करून अमिषापोटी सामील झालीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या खांद्यावर समाजाची धुरा देऊन समाजहित जोपासावे अशा संदेश दिला होता. त्यांच्या या विचारांची पायमल्ली होत असताना दिसत आहे. तरीपण समाजातील भाडोत्री पुढाऱ्यांची एक दिवस वाटचाल ही कत्तलखान्याकडे नक्कीच जाईल ह्यात काही शंका नाही.
दि. 28 मे 24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत