कोण नामदेव ढसाळ…?

माणूसपणाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या रस्त्यांवर
मी शोधतोय माणूस
माझ्या रक्तात उष्ण आहे त्याच्या दुःखाचा रंग
त्याच्या वेदनेचा आवाज मी माझ्या हाडांमध्ये ऐकतो
अरे कुठे हरवली माणुसकी?
ही कविता माणुसकी वर आधारलेली आहे ढसाळ आपल्या सांगतात की समाजातील अन्याय भेदभाव आणि शोषण यामुळे माणूसपण हरवत चाललं आहे
त्यांच्या लेखणीतील शब्द हे रागाने धगधगणारे होते पण त्या रागामागे खोल आत्मीयता आणि एक समाजसुधारणेची आस होती ढसाळांना फक्त दलितांच्या नव्हे तर साऱ्या शोषितांच्या दुःखाची जाणीव होती म्हणूनच त्यांची कविता केवळ एक विद्रोह नसून माणसाला माणूस म्हणून उभं करण्याची धडपड होती
माणसाने माणसास माणूस म्हणून पाहावं ही त्यांची आयुष्यभर राहिलेली इच्छा…
कामाठीपुरा सारख्या एरियामध्ये वाढलेल्या ढसाळांनी लहानपणी पासूनच रक्तपात अन्याय गरिबी बघितली होती म्हणून तो सगळा संघर्ष त्यांच्या नसानसात भिनला होता आणि त्यातूनच जन्म झाला एका विद्रोही साहित्यिकाचा त्याचंच नाव नामदेव ढसाळ आणि सेन्सर बोर्ड सहज म्हणून जातंय की कोण नामदेव ढसाळ आम्ही नाही ओळखत खरे तर यातून त्यांच अज्ञान नाही तर द्वेष दिसून येतो, सुधरा लोकहो सुधरा
आर्जे पाटील
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत