महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

व्यवस्था परिवर्तन वादी विचारांच्या आधारेच व्यवस्था परिवर्तन मार्गातील अडथळा निर्मिती , व त्या वरील उपाय योजना ,,,,,,!

ऍड अविनाश टी काले , अकलूज 
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर 
मो नं :- 9960178213

भारतातील जाती व्यवस्था , आणि या मुळे आलेल्या सामाजिक , आर्थिक , राजकीय मागासलेपण या विरोधात सामाजिक व राजकीय संघर्ष निर्माण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्या नंतर या उपेक्षित वर्गाचा प्रशासकीय , राजकीय कोटा आरक्षण निती द्वारे घटनात्मक संरक्षण देऊन अबाधित ठेवला .
या उपेक्षित वर्गाचे राजकीय अस्तित्व स्वंतत्र रित्या रहावे म्हणून त्यांनी तत्कालीन सर्वात प्रबळ अश्या काँग्रेस पक्षा पासून या पक्षाची एकाधिकार शाही निर्माण होऊ नये म्हणून शेद्युल्ड कास्ट फेडरेशन काढून राजकीय विरोध केला , त्या नंतर रिपाई पक्ष सर्व समावेशक निर्माण केला जावा म्हणून कांहीं विद्वानांना पत्रे लिहिली , आणि या त्यांच्या स्वप्नाच्या आधारे त्यांच्या मृत्यू पछात आंबेडकरी अनुयायांनी हेच नाव घेऊन एक जातीय गठ्ठ्याच्या ही इतक्या
चिरफाळ्या अधिकृत रीत्या केल्या , की हे नाही तर ते घ्या , म्हणून अनेक पर्याय विकसित केले ,
त्या नंतर बहुजन नावाचे पर्व सुरू झाले , बहुजन समाजातील बहुतेक सर्व प्रेरणादाई नेत्यांच्या तसबिरी लाऊन एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांना एकत्रित करून बहुसंख्याक बनून राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या राजनीतीचा काळ आला ,
सत्ता संधी कोण देतो या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करून राजकीय बळ वाढवण्याची रणनीती आखली गेली , या सत्ता संपादन द्वारे जी कमाई केली गेली त्यालाच ब्लॅक मेल करून भाजप सारख्या पक्षाने या बहुमताच्या राजकीय वाघाला बंदिस्त केले ,
आपली माणसे या ही चळवळीत व पक्षात घुसवून ते तत्वज्ञान च बदलण्यास भाग पाडून ,त्याला ब्रम्हा विष्णू महेश बनवून टाकले , आणि हा बलाढ्य पक्ष गिळंकृत करून टाकला .
पण या पक्षाच्या जडण घडणीच्या वेळी निर्माण करण्यात आलेला युक्तीवाद
काँग्रेस साप नाथ ,,, तर भाजपा
नागनाथ हे जन माणसावर आज ही अधिराज्य गाजवत राहिला
तुम्ही शासन कर्ती जमात बना ,,,, हा संदेश घेऊन शासनकर्ते बनण्याची स्वप्ने विकण्याची दुकानदारी ही अनेकांनी चालू केल्या , या पैकी महाराष्ट्रात वंचित हा असाच एक राजकीय पक्ष ,,,,
मान्यवर कांशीराम जी यांनी ते सत्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली , देशभर सायकल घेऊन लाँग मार्च काढत परिवर्तन घडवले , आणि
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा सत्ता निर्मितीचा फॉर्म्युला बनवून सत्तेचे वाटप जात निहाय करत , सर्व जन सुखाय ची अनुभाती निर्माण केली , हजारो , लाखो कार्यकर्ते व त्यांची प्रामाणिक तळमळ यातून ही क्रांती उभी केली गेली.
पण आपल्या कडे “उल्हास नगर ” चां माल निर्माण करणारे ही नकलाकार कमी नाहीत ,
यातून बहुजन नावाच्या अनेक नकला राजकीय आणि संघटनात्मक पातळीवर बाजारात आल्या .
आपले वेगळेपण दर्श्र्वण्या साठी , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ” काँग्रेस हे जळते घर आहे ” या कोटेशन चां उच्चार इतक्यांदा झाला आहे , की राजकीय दृष्ट्या अगदी पोर वयातील मुलगा ही काँग्रेस हे जळते घर आहे हे वाक्य उच्चारून टाळ्या मिळवतो .
” काँग्रेस हे जळत घर आहे ,, अस डॉ बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले होते ? हा साधा प्रश्न ही कुणी स्वतः ला विचारत नाही .
काँग्रेस इज ए हेट्रोजिनियस बॉडी अस वर्णन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होत ,
याचा अर्थ हा पक्ष परस्पर विरोधी हित सबंध असलेल्या जात वर्गाची मोळी आहे , म्हणजे इथे ब्राम्हण , वैश्य , क्षत्रिय , अती शूद्र ,
अल्पसंख्यांक , गरीब , श्रीमंत , कामगार , मालक कारखानदार , शेत मजूर , जमीनदार असे सर्व जण आहेत , आणि त्यांच्या हित संबंधाचा टकराव आपापसात होईल , व यातून काँग्रेस संपून जाईल ,,
जसे घर जळाल्या नंतर त्याचे अवशेष राहतात , पण त्यास घर म्हणता येत नाही .
तसे या पक्षाचे भवितव्य नाही , एवढेच त्यांना म्हणायचे होते .
जळणारी वस्तू स्वतः जळून राख होते , ती इतरांचे नुकसान करू शकत नाही ,
पण भारतीय राजकारणात अस्तित्वात असलेल्या जन संघाने , भारतीय जनता पक्ष हे नाव धारण करून भारतीय राजकारणात 78 नंतर प्रवेश केला ,
भारतीय जनता पक्ष , हा लोकशाही व्यवस्थेतील एक राजकीय पक्ष आहे , हा सर्वात मोठा गैर समज आपल्या पैकी अनेकांचा आहे , आणि हा पक्ष निवडणुकीत मते ही मागतो म्हणून तो पक्ष आहे ही चुकीची धारणा आहे
तर ब्राम्हणी वर्चस्व स्थापित करणारी व्यवस्था अस्तित्वात यावी या साठी पोषक असणारी समाज व्यवस्था , त्याची सनातनी अर्थ व्यवस्था , याच व्यवस्थेसाठी पोषक असलेली शिक्षण व्यवस्था , या सर्वांची सांस्कृतिक भूमी निर्माण व्हावी म्हणून हिंदू राष्ट्र निर्मिती करण्याचे साधन म्हणून सत्ता हस्तगत करण्याचे माध्यम म्हणून ते लोकशाही कडे पाहत आहेत .
त्यांच्या लेखी आज अस्तित्वात असलेल्या राज्य घटने ला गुणात्मक मूल्य नाही ,
म्हणून कोणत्याही प्रकारची साधन सुचिता असावी हा त्यांचा आग्रह नाही ,
एखादी वस्तू मोडली जात असताना ती आवाज न करता कुशलतेने मोडावी , की स्क्रॅप बनवणाऱ्या अजस्त्र मशिनरीचा वापर करून ती मोडावी ? एवढाच त्यांच्या पुढे प्रश्न होता .
ट्रोजन हॉर्स नावाची एक कथा आहे , ज्यात लाकडी घोड्यात स्वतःला दडवून शत्रू सैन्य आत घुसवले जाते , तसे संघाने त्यांची माणसे याच प्रचलित लोकशाहीच्या , शासन प्रशासन , मीडिया , व न्याय पालिका या प्रत्येक स्तरात माणसे घुसवली , त्यांचे कडे प्रमुखत्व सोपवले ,,
आणि नंतर त्यांचे हे आजचे ऑपरेशन चालू झाले आहे .
हे ऑपरेशन कोणत्या टप्प्यापर्यंत यशस्वी होईल , की त्यास स्थगिती द्यावी लागेल? हा परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल
या दरम्यानच्या काळात बऱ्याच उलथा पालथी झाल्याने दलीत मुस्लिम आणि या शिवाय लोकशाही वादी हिंदू नी ही निवडणूक काळात भाजपची साथ सोडली .
आणि काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , समाज वादी पार्टी , आदी गैर भाजपा पक्षास साथ दिली
काल शनिवार दिनांक 25/ 5/ 2024रोजी , समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महा सचिव राहुल गाकवाड व मी चर्चा करत होतो ,
त्यांनी दलीत आणि मुस्लिम यांच्या सत्ता भागीदारी चां मुद्दा मांडला ,
14% लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला कोणत्याच प्रस्थापित पक्षाने महाराष्ट्रात जागा वाटपात स्थान दिलेले नाही ,
आणि मीही अनेक वर्ष निरीक्षण आणि अनुभव याने सांगत आहे की नवबौध्द समाजाला पर्याय म्हणून इतर जाती समूहाला सत्ता संधी देण्यात हे प्रस्थापित पक्ष पुढे आहेत .
आमचे अस्तित्व जाळू पाहणाऱ्या पक्षाला मदत करायची नाही म्हणून आम्ही गैर भाजपा ला मदत करण्याची भूमिका घेतली , व प्रामाणिकपणे तिचे निर्वाहन ही केले .
पण हे असेच कुठ पर्यंत चालत राहणार?
मत विभाजनाचे फंडे रोखून धरण्यासाठी गैर भाजपा पक्षास मित्र मानणाऱ्या बौद्धिक वर्गाची कदर प्रस्थापित पक्ष करणार की नाही ? यावरच त्यांचे दीर्घकालीन यश अवलंबून आहे ,,,,
अन्यथा व्यवस्था विरोधी पक्ष त्यांच्या मान गुटीवर कायमचे बसून राहणार आहेत व त्यांचे पासून त्यांची सुटका तेंव्हाच होईल जेंव्हा ते नावाला ही शिल्लक राहणार नाहीत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!