जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावणार

यानिमित्त जालना रेल्वेस्थानकात सकाळी साडे ९ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता दूरस्थ माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी आकाशवाणीला दिली. ही वंदे भारत एक्सप्रेस जालना आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या शहरांना मुंबईबसह नाशिक, कल्याण, ठाणे या शहरांशीही जोडणार आहे. ही रेल्वे जालना ते मुंबई हे ४३४ किलोमीटरचं अंतर ६ तास ५० मिनिटांत कापणार असून या तीची प्रवासी क्षमता ५३० असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत