रेल्वेच्या जमिनीवर झोपडपट्ट्यांवरची कारवाई थांबवावी,अशी रिपब्लिकन पार्टीची मागणी…

या प्रश्नांवर काल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी झालेल्या चर्चत रेल्वे मंत्री यांनी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपडपट्याबाबत आम्हाला सहानुभुती आहे. राज्यातली रेल्वेस्थानकं आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांवरची कारवाई थांबवावी,अशी मागणी रिपब्लिकन पार्टीनं केली आहे. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निष्कासन कार्यवाही होत आहे. ती कार्यवाही थांबवण्याबाबत आपण विचार करत आहोत,असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रामदास आठवले यांना दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत