
मानवी तस्करी होत असल्याच्या कथित माहितीवरून हे विमान थांबवण्यात आले. फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी ३०३ भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं विमान काल वैत्री विमानतळावर थांबवले. फ्रान्समधील भारतीय दूतावासानं आपले घटनास्थळी पाठवलं आहे. या प्रकरणी तपास करत असल्याचं भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचं प्राधान्य असल्याचं त्यात नमूद करण्यात आले. हे विमान दुबईमधून दक्षिण अमेरिकेमधील निकाराग्वा इथे चालले होते. या प्रकरणी फ्रान्सने दोन जणांना अटक केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत