महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

‘या माणसानं देशाचं वाटोळं केलं’, जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टनंतर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य केलं आहे. ‘या माणसानं देशाचे वाटोळं केलं’, अशी पोस्ट एक्स ( ट्वीटर ) अकाउंटवर जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. याविरोधात आता अण्णा हजारे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. वकिलाचा सल्ला घेऊन आव्हाडांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो एक्स ( ट्वीटवर ) अकाउंटवर शेअर केला होता. त्यावर आव्हाड यांनी लिहिलं होतं की, “या माणसानं देशाचं वाटोळ केलं. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.”

यावर प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले, “माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं, असं म्हणायचं. पण, मी केलेल्या कायद्यामुळे जनतेचा फायदा झाला. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. माझ्या आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं, हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले. कदाचित ते त्यांना सहन होत नाही.”

“त्यामुळे काहीतरी कुरापती करायच्या, बदनामी करायची. मात्र, काही फरक पडत नाही. वकिलाचा सल्ला घेऊन ‘वाटोळं केलं’ म्हणणाऱ्याविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकणार,” असा इशारा अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!