‘बार्टी’चा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच वापरावा जेवणावळी साठी नाही :सुयश गायकवाड…

बार्टी’ या संस्थेचा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच वापरावा, जेवणासाठी वापरु नये अशी मागणी रावण साम्राज्य सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुयश गायकवाड यांनी बार्टी चे महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. भीमा कोरेगाव येथे दिनांक १ जानेवारी २४ रोजी शौर्य दिनानिमित्त विजय क्रांती स्तभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून अनुयायी भीमा कोरेगाव येथे येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणुन बार्टीच्या वतीने जेवण पुरविले जाते बार्टी ची ही योजना किवा उपक्रम अत्यंत चांगला आणि योग्य असाच आहे, परंतु ज्या कामासाठी बार्टी संस्थेकडे पैसा देण्यात आलेला आहे, त्याच कामासाठी हा पैसा वापरणे आवश्यक आणि गरजेचे आहे, असेही सुयश गायकवाड यांनी म्हंटले आहे. जर जेवणावळी च करायच्या असतील तर बार्टी ने या साठी वेगळा निधी सरकारकडून मागवून घ्यावे, अशीही सूचना सुयश गायकवाड यांनी केली आहे. बार्टी च्या वतीने दर वर्षीप्रमाणे जेवणावळीवर पैसे उधळण करण्याचं काम करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाला सांगणे आहे की आणि बार्टी कडे आमची मागणी आहे की आम्हीं कोणीही तिथे जेवण करण्यासाठी येत नसतो किंवा कोणाचीही जेवणावेळी करण्याची मागणी नाही. आम्ही भिमा कोरेगाव येथे केवळ आमच्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो त्यामुळे बार्टीचा हा निधी बार्टी विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि प्रशिक्षण आणि संशोधनासाठी खर्च केला पाहिजे, तो इतर कुठल्याही कारणासाठी खर्च करण्यात येऊ नये. सध्याची जी काही बार्टीने काढलेली जाहिरात आहे किंवा घेतलेला निर्णय तो तातडीने मागे घेण्यात यावा. बार्टीच्या संशोधक विद्याथ्यांकडून अनेकदा फेलोशीप साठी आंदोलन करण्यात येत आहेत, दोन- दोन, तीन-तीन महिने विद्यार्थी आंदोलनाला बसलेले असतात आणि बार्टीच्या अधिकारी किंवा शासनाकडून सांगण्यात येते की आमच्याकडे निधी नाही. विद्याथ्यांसाठी असलेली संस्था ही विद्याथ्यर्थ्यांना निधी नाही असे सांगते दुसरी कडे मात्र जेवणावळीवर उधळण करते. पैशाची उधळ पट्टी करत असते, या मागचे जे काही खरे कारण आहे ते ठेकेदारांचे हित जपण्याचे आणि त्यातून टक्केवारी घेवुन किंवा तोड पाणी करण्याचे कुटिल कारस्थान आणि राजकारण सुरू आहे ते तातडीने थांबविण्यात यावे. अन्यथा पुणे येथील बार्टी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनं केले जाईल असा इशारा ही रावण साम्राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत