महान कृतिशील संत गाडगे बाबा यांच्या पवित्र स्मृतींना दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन.


वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा
( पुण्यतिथी निमित्त )
जया नाईक ✍️
चिखली ( दारव्हा )
महाराष्ट्राचे दोन गुण फार महान आहेत. शौर्य आणि त्याग हेच गुण आहेत. यामुळे महाराष्ट्रात वीरांची आणि संतांची पीक अमाप झाले. संत गाडगेबाबा संपूर्ण
संत मालिका सांगायची तर यांच्या नावाने एक मणी ओवावाच लागेल.
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा साधा उपदेश तितक्यात साधेपणाने ते आपले कीर्तनात करीत. त्यांनी कीर्तनातून महाराष्ट्रभर गजर केला, संचार केला. बहुजन समाजातील प्रचंड लोकप्रिय झाले.
संत गाडगेबाबा यांनी ‘ स्व ‘ चा सर्वस्वी त्या केला होता. हे अक्षरशः इतरांसाठीच उरले होते. आपले ‘ मी ‘ पण त्यांनी सपशेल सोडून दिले होते. ते एका गावात कीर्तन करीत असतानी पोस्टमनने त्यांचा मुलगा गोविंदराव मरण पावला त्याबाबतची तार आणली. दुःखी मनाने बाबांना सांगत होते, आपले गोविंदराव जगातून गेलेत. त्यावेळेस ते क्षण मात्र स्तब्ध राहिले आणि एकदम उदगारले, अरे, ऐसे गेले कोट्यानु कोटी, रडू काय तिथे एकाचे साठी! एवढे समाजामध्ये समरस झालेले संत गाडगेबाबा होते.
गाडगेबाबा हे आडनाव नव्हते. त्यांच्या हाती गाडगे म्हणून लोक त्यांना म्हणत गाडगेबाबा ! अंगावर गोधडी असायची म्हणून लोक त्यांना म्हणत गोधडे महाराज. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगरुजी जानोरकर असे होते. लोकांचे दैन्य, दारिद्र्य अडाणीपणा, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अत्यंत अनिष्ट चालीरीती पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी सर्व मोहमाया सोडून दिली. मानव सेवेसाठी उर्वरित आयुष्य समर्थन करण्याचा निर्धार केला. त्यांची मानवसेवीची रीत अगदी वेगळी होती. जिथे कीर्तन – भजन करायचे तिथे खडूने लिहून ठेवत – आज रात्री गाडगे बाबाचे कीर्तन ! बस्स ! एवढी जाहिरात.! पण रात्री कीर्तनाला तुडुंब गर्दी उसळलेली असे. जिथे कीर्तन असायचे ती जागा संत गाडगेबाबांनी स्वतः झाडून स्वच्छ केलेली असायची! कीर्तनापूर्वीच त्यांनी या आचरणातूनच त्यांचा फार मोठा संदेश पचविलेला असायचा ! लोकहो, स्वच्छता पाळा! संत गाडगे बाबा म्हणत की, श्रीमंत असा की गरीब असा, बडे असा की छोटे असा, दररोज पंधरा मिनिटे तरी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली पाहिजे.
महाराष्ट्रात कीर्तनाची पद्धत ठरलेली आहे. कीर्तनकार एखाद्या अभंगाचे किंवा श्लोकाचे गोष्टी सांगत संगीताच्या साथीत विद्वत्तापूर्ण निरूपण करतात. पण संत गाडगेबाबाचे किर्तन औरच असे. त्यांचा उपदेश साधा सोपा होता. श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद करीत हे आपला उपदेश पटवून देत. एक मुद्दा पटविला की, *लगेच समेवर येत मुलाला आणि मुलीला शाळेत पाठवा! तरस त्यांची जीवन आरपार बदलेल ! संत गाडगेबाबा आपल्या अवीट शैलीत सांगत –
हे लोक का गरिबीत ? साहेब, सांगा हे लोक का गरिबीत राहिले ? एक तर याहीले नाही विद्या. काही नाही ? विद्या! जाले विद्या नसेल त्याला खटार्याचा बैल म्हटलं तरी चालेल ! आता तरी सुधरा. तरी मुलीला शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावात घ्या. पण मुलाला शाळेत घातले विना सोडू नका ! विद्या मोठे धन आहे ! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, त्यांच्या पिढ्यान पीडित झाडू मारायचे काम केलं. त्यांच्या वडिलांचे सुबुद्धी सुचली आणि लहानसान कमाई केली नाही. हिंदुस्तानची घटना केली, घटना !
वरील घटनेवरून संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण जीवन त्यांच्या ह्यातीत समाज जनजागृतीचे काम केले. शेवटच्या घटकेस 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले आणि कायेने ते आपल्यातून निघून गेलेत. पण त्यांचे विचार अजूनही अजरामर आहेत.
अशा या वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना आजच्या दिनी त्रिवार वंदन !
दि.20 डिसें 23.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत