दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

समताधिष्ठित भारत निर्माणासाठीव्यवस्थेवर घाव घालण्यास कटिबद्ध होऊ या…

मराठी साहित्यातील उपेक्षित, दुर्लक्षित, शापित लेखनीसम्राट अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती !
अवघा दीड दिवस शाळेत गेलेल्या अन् शाळेत अबकडही नि गिरवलेल्या अण्णाभाऊंची विपुल साहित्यसंपदा त्यांच्या उपजत गुणवत्तेचं जितं जागतं द्योतक होय.
अण्णाभाऊंना अवघं 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. पण जाता जाता त्यांनी आपल्या अनुयायांना दिलेला संदेश लाखमोलाचा होय. “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव !”
अण्णाभाऊंना आणखी पाच-पंचवीस वर्षे मिळाले असते तर महाराष्ट्रातील दोन भावांमधील सध्या झपाट्याने वाढत असलेले अंतर झपाट्याने कमी झाले असते. आंबेडकरवादी चळवळीला अधिकचे बळ मिळाले असते.
प्राप्त परिस्थितीत अण्णाभाऊंचा संदेश इमानेइतबारे अंगिकारत वाटचाल करणे हेच ख-या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.
‘ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है’ अशी गगनभेदी ललकारी देणा-या लढवय्या लोकशाहिरास विनम्र अभिवादन आणि सर्वांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा !

चला तर मग…
रेशिमबागेच्या भुलभुलैय्यात न अडकता समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी मनूवादी व्यवस्थेवर घाव घालण्यास नव्याने कटिबद्ध होऊ या…

जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!

भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’,
रविराज पार्क, परभणी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!