मुख्य पानमुख्यपानराजकीय

मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी का दिले राजीनामे .

मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत चर्चा होणार आहे. त्याचवेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. आयोगाच्या या राजीनामा सत्रासंदर्भात सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी आतील बातमी सांगितली. त्यांनी 1 डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनीही राजीनामा दिला. आयोगाचे सदस्य सोनवणे यांचा राजीनामा यापूर्वी आला होता. आता आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला. असे बालाजी

बालाजी किल्लारीकर म्हणाले आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सरकारच्या ज्या बैठका झाल्या आहेत. त्या बैठकीत असे लक्षात आलं की सर्व जातीचा सर्व्हे न करता एकाच जातीचं सर्व्हेक्षण करण्याचा राज्य सरकारचा आग्रह होतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सखोल सर्व्हेक्षण करण्याचे सांगितले . त्यामुळे आमच्यात मतभेद निर्माण झाले. मच्या अधिकारात सरकारचा हस्तक्षेप होत आहे. शासन त्यांचे निर्णय आणि सूचना आमच्यावर लादत होते. त्यामुळे आम्ही आमचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दुसरे अध्यक्ष नेमून आयोगाचे कामकाज सुरू राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या अटींच्या अधीन
आम्ही कुणाच्या बाजूने नाहीत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या अटींच्या अधीन राहून काम करतो. मराठा आंदोलन आणि मागासवर्गीय आयोग याचा काही संबंध नाही. बाहेरच्या बाबींचा दबाव आयोगावर नको होता. आयोग राज्य शासनाच्या अधीन राहून कधीही काम करु शकत नाही. आयोग हा राज्य शासनाचे एक अंग आहे. मी कोणत्याही आंदोलनाबाबत काहीही मत व्यक्त करणार नाही. आंदोलनाबत कोणत्याही सदस्याने बोलू नये यावर मी ठाम आहे, असे किल्लारीकर यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!