महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भिवंडीत दोन तरुणांनी अल्पवयीन मुलाची केली हत्या

 गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भिवंडी काल्हेर येथील एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ही हत्या १९ वर्षीय दोन तरुणांनी पूर्ववैमनस्यातून केली. त्यांना अटक करण्यात आली आहे. आयुष आणि मनोज यांचे योगेश यांच्याशी वाद होता. त्यामुळे त्यांनी त्याला २५ नोव्हेंबरला काल्हेर भागातील रेतीबंदर येथे बोलावले. तिथे त्याची कोयता आणि चॉपरने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला.

योगेश शर्मा (१६) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, त्याच्या हत्येप्रकरणी आयुष झा (१९) आणि मनोज टोपे (१९) या दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. काल्हेर येथील आशापुरा गॅलेक्सी या इमारतीमध्ये योगेश राहत होता. २५ नोव्हेंबरपासून तो बेपत्ता होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती.

योगेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉलची माहिती घेतली. त्यावेळी तो बेपत्ता झाला त्या दिवशी आयुष आणि मनोज यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली. यानंतर पोलिसांच्या पथकाने आयुष आणि मनोज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी पूर्ववैमनस्यातून योगेशची हत्या केल्याची कबुली दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!