महापरिनिर्वाण दिनमुख्यपानविचारपीठसंपादकीय

हा बाबासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील शेवटचा फोटो ठरला.

३० नोव्हेंबर १९५६ ला बाबासाहेब नेपाळमधील काठमांडू येथील विश्व बौद्ध संमेलनावरून दिल्लीत परतले. परतताना त्यांनी बौद्ध स्थळांची यात्रा केली. हा फोटो सारनाथ येथील बाबतपुर विमानतळावर ६७ वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. दुर्दैवाने हा बाबासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील शेवटचा फोटो ठरला. त्यानंतर आठवडाभरातच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.या फोटोत डावीकडून भन्ते धर्मरक्षित, भंते एच सदातिस्सा, डॉ . बाबासाहेब आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर व भंते संघरत्न आहेत.आपण देह झिजविला असे म्हणतो. बाबासाहेबांनी समाजासाठी, देशासाठी, उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी अक्षरश: देह झिजविला. हजारो, करोडो लोकांच्या जीवनातील अंधार बाबासाहेबांनी दूर करत त्यांचे आयुष्य घडविले, फुलविले. अजूनही बाबासाहेबांचे विचार त्यांच्या लेखनातून, भाषणांतून जगभरातील जनतेला मार्गदर्शन करत असतात.म्हणूनच बाबासाहेब महानायक ठरले!महामानव ठरले!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!