महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

“भंडाऱ्याच्या मेळाव्यात काय संकल्प मांडले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ?” वाचा सविस्तर…

भंडाऱ्यात भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे संकल्प मांडले. देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवलं आहे. तर, तेलंगणात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. दरम्यान, या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये  भाजपा उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.  बावनकुळे म्हणाले, आजच्या मेळाव्यात आपण पहिला संकल्प करायचा आहे की येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच मे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र् मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार त्यांच्या समर्थनात असायला हवेत. त्यातला भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता हात वर करून उभा असला पाहिजे.

दुसऱ्या बाजूला, भाजपाने आगमी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजपाप्रणित महायुतीने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!