महाराष्ट्रमुख्यपान

खेर्डा प्रकल्पात अखेर पाणी सोडले

शेतकऱ्यांनी खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली होती. पालकमंत्री भुमरे यांच्या सूचनेनुसार माजी जि.प. सभापती विलास भुमरे, छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, उपविभागीय अभियंता कैलास साळी, शाखा अभियंता सुजित कांजुणे, युवराज बावस्कर यांनी पाण्याचे आवर्तन सोडले. खेर्डा प्रकल्प कोरडाठाक झाला होता. त्यामुळे परीसरातील नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत होती.

पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेतून खेर्डा लघु प्रकल्पात पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी उध्दरण नलिकेच्या १५०० एमएम व्यासाच्या नलीकेतेतून शनिवार (ता.२) आवर्तन सोडण्यात आले असून ४.१० क्युसेक वेगाने हे पाणी सोडण्यात आले आहे. यामुले खेर्डा परीसरातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!