२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता काही खूप वेगळे केले असे नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले वक्तव्य

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही आम्ही तटस्थ राहून भाजपला मदत केली होती. त्यामुळे आता काही खूप वेगळे केले असे नाही.
भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याची देशात अनेक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला नितीश कुमार यांनीही भाजपशी युती केली होती. त्यांनी आपल्या पक्षाचा विचार सोडला नाही. आम्हीपण विचार सोडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
‘जातनिहाय जनगणना व्हावी’
मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पाहिजे याबाबत दुमत नाही. पण ते देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागायला नको. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच कार्यवाही व्हायला हवी. मागासवर्ग आयोगाचा अभ्यास, जुने अभिलेख, शिंदे समितीचा अहवाल या सर्व बाजूही महत्त्वाच्या असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना व्हायला हवी.
विविध राजकीय पक्षांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आमची चर्चा झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत