मुख्यपानराजकीय

“भाजपवर टिका करत आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे नाना पटोले म्हणाले.”

शेतकऱ्यांच्या भावना सरकारला कळत नाही. महागाई, बेरोज़गारीमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असेही नाना पटोले म्हणाले. भाजप हा आरक्षण विरोधी पक्ष असल्याचा पुनरुच्चार करून पटोले म्हणाले, गरिबी ही जात असून गरीब व श्रीमंत दोनच जाती ठेवायच्या असे पंतप्रधानच सांगतात.  

सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे आहेत. जनतेचे पैसे लुटायचे आणि स्वतःची पाठ थोपटायची, उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरीबांना सिलिंडर दिले पण, केरोसिन बंद केले. सरकार नफा कमवण्यासाठी जनतेला लुटण्यासाठी आहे, अशी तोफही नाना पटोलेंनी डागली. विधानसभाध्यक्षांकडे सरकारची उलटतपासणी सुरू झाली आहे. इतिहासात कधी असे घडले नाही. १०५ आमदार निवडून आलेल्या भाजपने सत्तेसाठी खेळखंडोबा केला, अशी टीकाही त्यांनी केली.

संपुष्टात आणण्याची व्यवस्था सुरू झाल्याचे स्पष्ट होते. सरकारने जातनिहाय गणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व जातीच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात.  

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!