“ब्राह्मण समाज २८ नोव्हेंबर पासून करणार अमरण उपोषण”

जालन्यात विविध मागण्यांसाठी दीपक रणनवरे यांचा पुढाकार
ब्राह्मण समाजाची सामाजिक परिस्थिती अतिशय गंभीर बनत आहे असे नाईक म्हणाले. यावेळी शुभांगी देशपांडे यांनी ब्राह्मण समाजावर विनाकारण टीका व द्वेषपूर्ण टिप्पणी करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला व्देष भावनेने पाहिले जात आहे. काही लोक सामाजिक विष पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी २८ नोव्हेंबरपासून जालना येथे दीपक रणनवरे समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गांधी चमन येथे प्रातिनिधिक स्वरूपात आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती अॅड बळवंत नाईक यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला स्वतंत्रपणे तातडीने जाहीर करावे, यांसह इतर मागण्यांसाठी शालिनी पुराणिक यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीस उपस्थित समस्त् ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यामुळे लोकशाही प्रक्रियेत असणाऱ्या अधिकाराचा वापर करत जालना येथील गांधी चमन याठिकाणी २८ नोव्हेंबरपासून दिपक रणनवरे आमरण उपोषण करणार आहेत, असे सांगण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत