महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

“मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी  प्रशासनाला धारेवर धरताच धरणातून पाणी सोडण्याचे  दिले आदेश.”

असे मिळणार पाणी

मुळा धरण समूह मांडओहळ २.१० टीएमसी

प्रवरा धरण समूह भंडारदरा, निळवंडे, आवळा, भोजापूर: ३.३६

गंगापूर धरण समूह (गंगापूर, कश्यपी, गौतमी, गोदावरी) ०.५

गोदावरी दारणा धरण समूह (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे बालदेवी) २.६४३ टीएमसी66

कार्यकारी संचालकांचे आदेश, प्रक्रियेला आणखी दोन दिवस लागणार उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास नगर, नाशिककरांचा विरोध कायम आहे. अखेर शुक्रवारी (दि. २४) मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर घरताच शासनस्तरावर हालचालींना वेग आला. कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी तातडीने वरच्या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. परंतु, प्रक्रियेला आणखी दोन दिवस लागणार असून पाटबंधारे विभागाने नियुक्त केलेले ३ पथक शनिवारी (दि. २५) पाहणी करतील. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!