क्रिकेटभारतमुख्यपान

टी २० मधून निवृत्ती घेणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? जाणून घेवू या सविस्तर …!

BCCI च्या धोरणाची चर्चा!

बीसीसीआयकडून पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आत्तापासूनच संघ बांधणीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठीच बीसीसीआयकडून या संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच या संघात विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयकडून या दोघांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नसल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने क्रिकट्रॅकर संकेतस्थळानं दिलं आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय खेळाडूंप्रमाणेच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचा स्वप्नभंग झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेमधून विश्वचषक स्पर्धेच्या संघातील बहुतेक खेळाडूंनी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंचा संघ या मालिकेत उतरवण्यात आला आहे. मात्र, विराट कोहली व रोहित शर्मा या भारताच्या दोघा स्टार खेळाडूंनी फक्त याच मालिकेतून ब्रेक घेतला नसून ते थेट टी २० क्रिकेटमधूनच निवृती घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

निर्णय दोघांवर सोपवला!

या वृत्तानुसार, बीसीसीआयनं टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं की नाही, यासंदर्भातला निर्णय पूर्णपणे विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांवरच सोपवला आहे. या दोघांनी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला, तरी बीसीसीआयकडून त्यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे आता विराट कोहली व रोहित शर्मा नेमका काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून या दोघांनी बाहेर राहणं पसंत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!