महाराष्ट्रमुख्यपान

राज्यपाल रमेश बैस यांनी केले वक्तव्य- “हिंदी अभिनेते आपल्याच भाषेत बोलण्यास कचरतात”

गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पार पडलं. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अणुशक्ती भवन तुर्भे (मुंबई) येथे गुरुवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रमेश बैस म्हणाले, राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत मला भेटायला येतात. त्यातील काहींना तर हिंदी भाषादेखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. रमेश बैस म्हणाले, जगात भारत एकमात्र देश आहे जेथे आपलीच राष्ट्रभाषा वाचवण्यासाठी समिती नेमावी लागते. हिंदी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात; हिंदी भाषेत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!