राज्यातील शाळांमध्ये ‘वाचन चळवळ’, घेण्यास शालेय शिक्षण विभागाची मान्यता.

मुंबई: 23/11/2023
विद्यार्थी भाषा नैसर्गिकरित्या शिकतात. मात्र विद्यार्थ्यांनी वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. इयत्ता दुसरीमध्ये मुलांना वाचन येणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात इयत्ता तिसरीच्या ३० टक्केपेक्षा जास्त मुलांना लहान मजकूर, पाचवीपर्यंतच्या ४१ टक्के मुलांना त्यांच्या श्रेणीचा योग्य मजकूर वाचता येत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
वाचन हि काळाची गरज आहे मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून वाचन होत नसल्याचे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत राज्यातील तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल ओघवते वाचन करू शकेल, आठवीपर्यंतचे प्रत्येक मूल शिकण्यासाठी वाचू शकेल हे सुनिश्चित करणारी आनंददायी वाचनाची चळवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने आता राज्यात वाचन चळवळ राबवली जाणार आहे. या वाचन चळवळीत शालेय शिक्षण विभाग, राज्यसरकार, युनिसेफ, रीड इंडिया आणि प्रथम बुक्स या संस्थांचा सहभाग आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत