महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मुंबईकरांनो… पाणी जपून वापरा

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या यंत्रणेमधील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टमचे एअर ब्लॅडर बदलण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे २ डिसेंबरपर्यंत ही पाणीकपात सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच पाण्याचा जपून वापर करा असं आवाहनही केलं आहे.

मुंबईला होणाऱ्या ३८५० दशलक्ष लिटर पाण्याव्यतिरिक्त १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी पालिकेला देण्यात येते. यामध्ये भातसामधून १०० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी आणि ५० दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे या पाणीपुरवठ्यावरदेखील परिणाम होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे, भिवंडीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही १० टक्के कपात लागू करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!