नवी मुंबईत ” संविधान बचाव याञे ” चे जंगी स्वागत

” रिपब्लिकन सेना ” सर सेनानी – आनंदराज आंबेडकर यांनी ” इव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव..! संविधान के सन्मान मे हम सब मैदान मे, किसान के सन्मान मे हम सब मैदान मे चा बुलंद नारा दिला ..!
नवी मुंबई / के. एच. हनवते :-
” रिपब्लिकन सेना ” सर सेनानी – आनंदराज आंबेडकर साहेब, व तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष – काकासाहेब खंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मुजीब (भाई) पठाण, महीला प्रदेश प्रभारी सारिकाताई शिंदे सह रिपब्लिकन सेना पदाधिकारी यांनी ” दिक्षा भुमी ते चैत्यभूमी संविधान बचाव याञेची सुरुवात केली. त्याचे नवी मुंबईत आगमन झाले असता अशा भव्य दिव्य संविधान बचाव याञेचे जंगी स्वागत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नवी मुंबई जिल्हाध्यक्ष – खाजामिया पटेल, घर हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष – हिरामण (दादा) पगार सह रिपब्लिकन सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले. त्या आनुशेंगाने विशनुदास भावे नाट्यग्रुह येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यात आनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करुन “संविधान के सन्मान मे हम सब मैदान मे..! चा नारा बुलंद केला. त्यावेळी नवी मुंबई आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज – कल्याणराव हनवते यांनी ” इव्हीएम हटाव देश बचाव..! ” संविधान के सन्मान मे हम सब मैदान मे..! चा लढा आधीक जोमाने तिव्र केला पाहीजे. अता आंबेडकर घराण्याशिवाय या देशाला व समस्त वंचित बहुजन समाजाला पर्याय नाही हेच अता समाजाला ठनकाऊ सांगीतले पाहीजे आसे ही म्हणाले. या कार्यक्रमास समाज सेवक विरेंद्र लगाडे, चंद्रकांत कांबळे, प्रज्ञेश कांबळे, रिपब्लिकन सेना नवी मुंबई ऊपाध्यक्ष नंदकुमार भालेराव, ऐरोली विधानसभाध्यक्ष प्रकाश वानखेडे, वाशी विभाग प्रमुख उमेश खंदारे, नवी मुंबई महिला सचिव दिपा बम, शोभा इंगळे, वनीता बनसोडे, इत्यादी कार्यकर्ते पदाधीकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे भारदस्त सूत्रसंचालन युवा कार्यकर्ता कैलास सरकटे यांनी केले. या संविधान बचाव याञे चा समारोप ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभुमी येथे करण्यात येणार आहे आसे जाहीर केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत