मराठा आंदोलकांच्या बीडमधील जाळपोळ संदर्भात बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 170 तरुणांना अटक

बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 170 तरुणांना अटक करण्यात आलीय त्यात अनेक तरुण बिगरमराठा आहेत.
जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता समोर येत आहे. जाळपोळ पूर्वनियोजित असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालात ही शक्यता वर्तवली आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण 25 वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जाळपोळीचा प्रकार मराठा समाज किंवा स्थानिकांनी केला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता.
बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण 25 वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 170 तरुणांना अटक करण्यात आलीय त्यात अनेक तरुण बिगरमराठा आहे. तसेच यामध्ये शिक्षण घेणा-या तरुणांचा मोठा गट आहे. या संदर्भातील अधिक तपास पोलीस करत आहे.
बीड आणि माजलगावमध्ये जमावाने जी जाळपोळ केली आहे. यामध्ये सर्वाधिक तरुण शिकलेली मुले असून अशा जमावामध्ये तरुण मुलांनी कायदा हातात घेऊन आपलं करिअर बरबाद करू नये असं मत डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केल आहे. जाळपोळी प्रकरणी आतापर्यंत 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सुद्धा आय जी चव्हाण यांनी दिली आहे. माजलगावमध्ये आणि बीडमध्ये जाळपोळीची घटना घडल्यानंतर पोलीस ही जाळपोळ कोणी केली याचा कसून शोध घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा आय जी चव्हाण यांनी केली आहे.
रास्तारोको, एसटीची तोडफोड अशा मार्गाने या आंदोलनाचा रस्ता नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला. बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या ‘या’ जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली. आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत