बौद्धांच्या दृष्टीकोनातून दिपावली – हर्षवर्धन ढोके

भारतात दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हर्ष-उल्हासाचा दीपावलीचा हा सन मात्र ब्राम्हणी धर्माच्या भाकड कथेशी जोडला जातो. हिंदू धर्माच्या इतिहासाच्या तज्ञांना जेव्हा हा प्रश्न करण्यात येतो की, दीपावलीचा सबंध हिंदू धर्माशी कसा ? तर या प्रश्नांना उत्तरे देत ते बळीराजाच्या काल्पनिक कथांशी दीपावलीचा सबंध जोडतात. त्यांना पुढे प्रश्न केला जातो की, बळीराजा-वामन कथा तुम्ही न्यायालयीन प्रमाणावर सिद्ध करु शकता काय ? अशावेळेस मात्र ते गर्भगळीत होतात. एककीकडे बौद्धही दिपावली हिंदूंचा सण आहे आणि हिंदू धर्माच्या कोणत्याही सणाशी आम्हाला काही घेणे-देणे नाही, असे ते म्हणतात. तेव्हा बौद्धांनाही हा प्रश्न केल्या जातो की, एकदाचे मानले की दीपावली बौद्धांचा सण नाही तर मग तो हिंदू धर्माचा सण कसा ? ते तरी स्पष्ट करा ? तर बौद्धही निरुत्तर होतात. आणि नको ते बिनबुडाचे उत्तरे देत बसतात. काहीतर इतके द्वेषाने बरबटले असतात की बौद्ध धर्म स्वतःची जहागीरी समजतात आणि त्यांनीच जनू जगात बौद्ध धर्म पोहचवीला असा गोड समज करून घेतात.
प्रश्न हा नाही की, बौद्धांनी दीपावली साजरी करावी. आणि अशी कुणी त्यांच्यावर जबरदस्तीही करीत नाही. बुद्धाने त्याच्या धम्माची अशी रचना करून ठेवली आहे की, कुण्याच्या वयक्तिक स्वातंत्र्याने बुद्ध धम्माचे पतन होत नाही. धम्म प्रतिपादित करताना त्याने उपासकाच्या वयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणली नाही. त्याने सरळ मनुष्याच्या विवेकाला आव्हान केले. एखाद्या विषयाबद्दलचा विवेक पारंपरिक लोकांपेक्षा वेगळाही असू शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल पूर्व ग्रह दूषित असतील तर द्वेषाने पेटलेल्या व्यक्तीचा विवेक नष्ट झालेला असतो. कुणाचे वयक्तिक स्वातंत्र्य नाकारणे हा अधिकार कुणालाही नाही. आपली कट्टर मते इतरांवर जोरजबरदस्तीने थोपता येत नाही.
वामन-बळीराजा या जर भाकड कथा आहेत आणि त्या प्रमाण, तर्कावर सिद्ध करता येत नाही तर मग दीपावली सणाचा उगम झाला तरी कसा ? बुद्ध म्हणतो, एखादी गोष्ट घडण्यामागे कारण असते. विनाकारण जगात कोणतीही गोष्ट घडत नाही. ते कारण एकतर मानवनिर्मित असते किंवा मग नैसर्गिक. दिपावली हे नैसर्गिक कारण नसून मानव निर्मित उत्प्रेशन आहे.
भारत देश हा फक्त आणि फक्त बौद्ध संस्कृतीचा देश आहे. भारतात ज्याही गोष्टी पर्वाच्या रुपात पाहायला मिळतात त्या फक्त बौद्ध संस्कृतीतून निर्माण झालेल्या आहेत. हिंदू धर्मात कोणताही पर्व साजरा केलाच जाउ शकत नाही कारण हिंदू धर्म जात आणि वर्णाच्या विषमतेने बरबटलेला धर्म आहे. ज्या समुहात दु:ख; विषमता असते तिथे आनंद साजरा होत नसतो. पर्व तिथेच साजरे होतात जिथे समता आणि बंधुता प्रस्थापित असते आणि हिंदू धर्मात समता नाही. दीप फक्त बुद्धासमोर लावतात. कारण दीप हे प्रकाशाचे, सुखाचे, हर्षाचे आणि प्रज्ञेचे प्रतिक आहे.
या दिवसात सर्व लोक दिपावली साजरी करीत असतांना बौद्ध समाज मात्र एकीकडे अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आठवून शोकाकूल होवून दु:खी होत असतो. हा इतिहास आठवून ददुःखी होण्याचे दोन कारणे आहेत.
१) बुद्धाचा प्रमुख शिष्य महामोग्गलायन याची कार्तिक अमावस्येला झालेली हत्या.
२) बळीराजाचा विष्णूने वामन अवतार घेवून कपटाने केलेला खून.
१) महामोग्गलायन हा बुद्धाच्या प्रमुख शिष्यापैकी एक होता. त्याची हत्या जैन धर्माच्या शिष्यांनी केली होती. मोग्गलायनने वर्धमान महाविरांच्या शिष्यांना बरेचदा वादविवादात हरविले होते. त्याचाच सूड म्हणून मोग्गलायन हा कालशीला पर्वतावर एकटा असतांना रात्रीच्या प्रहरी त्याला निगंठानी (जैन शिष्य) बेदम मारहाण करून अक्षरश: त्याचे हाडे चूर चूर केलेत. तशाच अधमऱ्या अवस्थेत तथागताच्या अंतीम दर्शनासाठी तथागताजवळ जाऊन मोग्गलायनने प्राण सोडला.
बुद्धाचा प्रमुख शिष्य महामोगालायनची हत्या ब्राह्मण व इतरानी मिळून केली व त्यानंतर दीप लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तिथून दिवाळीला सुरुवात झाली. ही भयंकर खोटी व असत्य गोष्ट आहे. त्रिपिटकाच्या आधारे ही गोष्ट असत्य आहे हे सिद्ध करता येते. तथागत बुद्धाचे प्रमुख शिष्य सारीपुत्र याच्या परीनिर्वानानंतर, महामोग्लायान यांचे परीनिर्वाणझाले. सारीपुत्तचे परीनिर्वाण कार्तिक पौर्णिमेला झाले. आश्विन अमावस्या म्हणजेच हिंदू धर्माच्या लक्ष्मी पूजनानंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. सारीपुत्ताच्या परीनिर्वाणानंतर पंधरा दिवसांनी कार्तिक अमावास्या येते. या दिवशी महामोग्गलायान यांचे परीनिर्वाण झाले.(ले. राहुल सांकृत्यायन- बुद्धचार्या, पा.क्र.483) त्यामुळे हे सिद्ध करणे अशक्य आहे की, महामोग्गलायन यांच्या हत्येनंतर दिवाळी जाणून करण्यात आली. दिवाळी व महामोग्गलायान यांचे परीनिर्वाण यामध्ये तब्बल तीस दिवसाचे अंतर आहे. ते कमी करणे अशक्य आहे. (कारण हे सर्व चंद्र कॅलेंडर नुसार ठरते त्यामुळे ते दुरुस्त करणे अशक्य आहे.)
२) दुसरी कथा बळीराजाची पाहूया.
बळीराजा हा दानशूर शेतकरी राजा म्हणून कथासंग्रहात प्रसिद्ध आहे. त्याची किर्ती इतकी होती की, आजही शेतकरी ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो.’ असे म्हणतात. बळीची किर्ती पाहून स्वर्गातील विष्णूने कपटाने वामन (ब्राम्हण) नावाचा अवतार घेवून बळीला तीन पाउल जागा मागितली. दानशूर बळीने वामनास तीन पाउले जागा दिली. एक पाउल आकाशात तर एक पाउल पृथ्वीवर यातच वामनाच्या पायाखाली सर्व जग आलं. तिसरा पाय कुठे ठेवावा म्हणून बळीराजाने तो पाय स्वत:च्या डोक्यावर ठेवावयास लावीला. वामन ने अशातर्हेने बळीचा अंत केला. बळीराजावर विजय म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा हा दिवस कपटाने साजरा केला जातो.
मोग्गलायनचा इतिहास तात्विक पातळीवर तपासून पाहता येतो. त्याचे प्रमाण उपलब्ध आहेत. तिथे बळीराजाची कथा मात्र ही तात्विक पातळीवर तपासून पाहिल्यावर विविध शंका आणि प्रश्न निर्माण होतात. विविध बळीप्रिय लेखकांनी जरी ती कथा शोधपूर्ण लिहली असली तरी विज्ञानाच्या आणि प्रमाणाच्या कसोटीवर ती कथा सिद्ध करता येत नाही. बळीराजा जरी हिंदू धर्माच्या बहुजनांसाठी अभिमानास्पद राजा वाटत असला तरी त्याचे कोणतेच प्रमाण सिद्ध होत नाही. उलट रावण,बळीराजा,परशुराम,प्रल्हाद हे पात्र राम-कृष्ण इतकेच भाकड कथा आहेत. ज्यानीही त्यांच्या पुस्तकात हे प्रतिवादी पात्रे रंगवलीत त्या सर्व लेखकांनी समाजात वैचारिक गोंधळ निरमा केला. डॉ.आ.ह. साळुंखे, मराठा सेवा संघ, बामसेफच्या लेखकांनी आपली वैचारिक दिवाळखोरी जाहीर केलीय. जिथे रामच नाही तिथे रावण - परशुराम कसा जन्माला येईल बरा ! त्यामुळे उगाचच दीवाळीच्या दिवशी बळीराजाची (काल्पनिक) हत्या झाली म्हणून वेडगळासारखे आम्ही बौद्ध समाजाने एका काल्पनिक कथेला कवटाळून दीपावलीच्या झगमग दिवसात आजूबाजूला झगमग असतांना स्वत: सोबत कुटुंबाच्या सदस्यांचे एका रंगाचे चेहरे करून दारे-खिडक्या बंद करून अंधारात गुपचूप बसण्यात कोणताही विशेष पराक्रम आपण करतोय असे वाटू नये.
इतिहास हा प्रमाणावर आधारित असतो. तो तर्काच्या कसोटीवर घासून तपासून पाहता यायला हवा. काल्पनिक गोष्टींचे प्रमाण देता येत नाही. त्यामुळे बळीराजा ही कथा मानता येत नाही. इतिहासाचे योग्य आकलण न झाल्यास गोंधळ निर्माण होत असतो. इतिहास लेखन भक्कम अशा पुराव्यावर करावयाचे असते. जिथे इतिहासातील प्रमाण मिळत नाही तिथे इतिहास तर्क आणि विवेकावर सिद्ध करावा लागतो. इतिहास लेखकांचा प्रयत्न सत्य शोधन्यासाठी असतो. जे नाहीसे होत नाही ते सत्य असते. इतिहास संशोधन पूर्णपणे एकप्रकारे भौतिकशास्त्र असते. एवढेच नव्हे तर इतिहास संशोधनाला काळ,स्थान आणि भुगोलाचा भक्कम पाया असावा लागतो. पुराव्याशिवाय बोलायचे नाही हा यातील दंडक असतो. अनुमाने करायची असेल तर तीही अपरिहार्य, तर्कशुद्ध आणि प्रमाणावर सिद्ध करता यायला हवीत. इतिहासाच्या या संशोधनावर हिंदू धर्माची दीवाळी,वामन, बळीराजा या गोष्टी पूर्णपणे पाल्हाळ, निरर्थक आणि बिनबुडाच्या ठरतात. दीपावली बौद्धांची नाही हे एकावेळ मानलेही पण ती हिंदू धर्मातील आहे हे कसे सिद्ध कराल? शेवटी प्रश्न आहे दीपावलीच्या शोधाची! ज्यांचा विरोध आहे त्यांनी दीपावलीचा उगम हिंदू धर्मातून झालीय हे प्रमाणावर तरी सिद्ध करावे ! उगाचच मला नाही पटत म्हणून विरोधाला विरोध कारणे म्हणजे स्वतःची भूमिका योग्य कशी असू शकते !
बळीराजा, वामन ज्या भाकड ग्रंथातून उचललेल्या आहेत ते रामायण, महाभारत,पुराणे हे हिंदू धर्माच्या फावल्या वेळातील मनोरंजनाच्या कथा-कादंबऱ्या आहेत.ज्याचा वास्तविक जिवनाशी तिळमात्रही संबंध नाही. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हिंदुत्वाचे कोडे आदी ग्रंथातून स्पष्ट करून दिले आहे. राम-सिता-कृष्ण-परशुराम,वामन-बळीराजा या त्या ग्रंथातील नायक नायिकांचे पात्रे आहेत. ज्याबाबत साक्ष,पुरावे,तर्क,अनुमान,अनुभुती,काळ,भौगोलिक स्थिती, प्रमाण यातील काहीच सिद्ध करता येत नाही. ज्यांनी या गोष्टी खऱ्या मानल्यात तो त्यांच्या विवेकाचा प्रश्न आहे. पण बौध्दही या गोष्टी खऱ्या मानायला लागल्यात ही मात्र चिंतेची बाब आहे.
हिंदू धर्माची दीवाळी लक्षात घेता वामन आणि बळीराजा यांचा वास्तव इतिहास काय म्हणून ! हिंदू धर्माच्या दीवाळीच्या समर्थकांना जर न्यायालयीन कठड्यात उभं केलं तर इतिहास सिद्ध न करता आल्यामुळे यांच्या अकलेचा हासा झाल्याशिवाय राहणार नाही. उलट न्यायालयाचा अमुल्य वेळ वाया घालविल्यामुळे हिंदू धर्म दीवाळी पुरस्कर्ते यांना आंशिक स्वरुपाचा आर्थिक दंड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण न्यायालय पुरावा मागतात आणि हिंदू धर्माचे ग्रंथ पुरावे नसून बुद्ध धम्माच्या प्रतिक्रांतीसाठी रचलेले भाकड कथा होत असेच न्यायालयाचा कदाचीत निकाल असेल.
जी गोष्ट जे लेखन सिद्धच करता येत नाही, ज्या कथा ग्रंथाची उत्पत्तीच मनोरंजनासाठी रचल्या गेली असेल त्यात संशोधन करणारे लेखक संशोधक विक्षिप्तच म्हणावेत ! त्यामुळे असल्या विद्वांनानी उगाचच आपल्या बुद्धीचे वाखाळे जनतेसमोर मांडून लोकांना मिसगाईड करु नये. जो वामन-बळीराजा झालाच नाही. त्याच्या चांगल्या अथवा वाईट चरित्र्याचे लेखन करण्यात काहीच अर्थ नाही.
चला आता येऊया मुख्य मुद्यावर…… ????????????????
मुळात दीपावली हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे. हिंदू धर्मात सणच नाही. कारण हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही. हिंदू एक संस्कृती आहे आणि संस्कृती ही नेहमी सभोवताल घडत असलेले चांगले संस्कार अनुकरण करीत असतात. बौद्ध धर्माने भारतालाच नाही तर उभ्या जगालाही बौद्ध संस्कार शिकविले आहे. हिंदू धर्मातील सण बौद्ध धर्मातील उसनवारी आहे. हिंदू धर्माननुसार दीवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत. त्या पूर्णत: भाकड कथा आहेत. त्यातील कोणतीही गोष्ट सिद्ध करता येत नाही. पैशांची देवी लक्ष्मी,अवतार घेणारा विष्णू, देव,नरकासुर, वामन या हास्यास्पद भाकड कथा आहेत. यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळमात्रही संबंध नाही. या काल्पनिक गोष्टींना हिंदूनी त्यांचे सण स्वीकारलेत. कोणतेही तर्कसंगत कारण नसतांना हिंदू धर्मीय सण साजरे करीत असतात. तिथे बौद्ध धर्मात सणांना कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही.हाच बुद्धाचा प्रतीत्यसमुद्पाद सिद्धांत आहे.
सणांची सुरवात भारतात बौद्ध संस्कृतीतून झाली आहे.* सण तेव्हा साजरे केले जातात जेव्हा आनंद होत असतो आणि आनंद तिथे साजरा होत असतो जिथे सर्व बाबतीत समानता असते. हिंदू समाजात जोगोजागी विषमता असल्यामुळे तिथे आनंदोत्सव सणाच्या स्वरुपात कसा साजरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
????दीपावलीचे बौद्ध धर्मात महत्व ????
????अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे याच दिवसात तथागताच्या स्वागत: साठी जोगोजागी बुद्धाच्या अनुयायांनी लाखो दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला असे लेखन विविध पुस्तकात आढळून येते.
????भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. भारताचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. ग्रीष्म ऋतू नंतर शेतकरी आणि शेतीवर काम करणारे मजूर हे त्यांच्या पिकांना भाव देतात. हा महिना अश्विन महिना असतो. त्यामुळे शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्यांजवळ मुबलक आर्थिक उत्पन्न यायचे. त्यामुळे शेतीवर निर्भर लोक दीप लावून उत्सव साजरा करायचे. त्याचेच नाव दीवाळी ही हजारो वर्षापासून सुरु आहे.
भारतातील बहुतेक सण शेतकरी (Landowner) व मजूर (Landless labour) यांच्या आर्थिक उत्पन्नावर आधारित आहेत. कारण भारत हा शेतकरी आणि मजूरांचा देश आहे. आजही वर्तमान काळातील सण हे शेतीवरच आधारीत आहेत. उदा. दीपावली, होळी इत्यादी. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे पिक विकल्या गेले तेव्हा तेव्हा सण त्यांनी साजरे केले. जर पावसाळ्यात पिक नाही झाले तर आजही शेतकरी दीपावली साजरी करीत नाहीत. कारण त्यांच्याकडे दीपावली साजरा करायला पैसे नसतात. बुद्ध काळात हा सण प्रज्ञावली म्हणून साजरा करावयाचे. प्रज्ञावली हा सण सम्राट अशोकानेही पुढे तसाच पूढे सुरु ठेवला. पुढे पुष्यमित्र शृंगाच्या प्रतीक्रांती नंतर प्रज्ञावली सण दिपावली आणि गाईच्या शेनाच्या पूजन स्वरुपात सुरु झाला. प्रज्ञावली सण अशोकाने इ.स. पुर्व २५७ ला केला होता.
???? चतुरासीति सहस्सानि ; अरामे कारयामह |
एकेकधम्मक्खन्धस्स ; एकेकाराम पूजयं ||
(दीपवंश पान. ११०)
बुद्धाने ८४००० वचने प्रस्तुत केलीत म्हणुन सम्राट अशोकाने ८४००० हजार बौद्ध स्तूप बांधले. हेच औचित्य लक्षात घेउन अशोकाने कार्तिक अमावस्येला जागोजागी दीपमाला आणि पुष्पमाला अलंकृत केल्यात. रत्यावर दुतर्फा दीवे लाउन सजविण्यात आलेत. ८४००० हजार स्तुप सोबत अशोकाने ८४००० दीप प्रज्वलीत केलेत. हा पर्व सतत सात दिवस चालला होता. भिक्कू आणि उपासकाना धनाच्या रुपात दान देन्यात आले. तो दिवस दीपावलीचा धनोत्रय दिवस म्हणून साजरा केला गेला. कारण अशोकाने आपला संपूर्ण खजिना धम्मासाठी दान केला होता. (अधिक वर्णनासाठी पहा महावंश पान न. ४९)
यामित्ताने प्रत्येक घरी आणि विहार स्वच्छ करुन बुद्ध वंदना घेण्यात आल्यात. या पर्वाच्या निमित्ताने प्रत्येक घराच्या आंगणात एक छोटे छोटे स्तुप बनिविण्यात आलेत. अशोकासारखे भव्य ८४ हजार स्तुपे सामान्य जनतेला बांधता येत नव्हते म्हणून एक छोटे नमुना स्तुप ते अंगणात बांधून आनंद साजरा करु लागले. जे दीपावलीला आपण शेतकऱ्यांच्या अंगनात पाहतो. आज आपण जे दीपावलीला वृंदावन, किल्ला, कुंडी हिंदूंच्या अंगनात पाहतो त्याचा इतिहास हाच आहे. या उत्सवाला देश विदेशची ८० करोड जनसंख्या आणि सोबत भिक्कू उपस्थित होते असे प्राचीन दीपवंश या ग्रंथात लिहिल्या गेले आहे.
????श्रीलंका येथे आजही बौद्ध संस्कृतीनुसार दीपावली साजरी केली जाते. राजा तिष्यने याच दिवसातील कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धर्म दिक्षा घेतली होती आणि श्रीलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता. त्या प्रित्यर्थ अशोकाला त्याने अलंकारीक भभेटवस्तु सुद्धा पाठविल्या होत्या.
????भारताच्या बाहेर जगातील बौद्ध राष्ट्र दीपावलीच्या या दिवसात दिप म्हणून मोठ मोठे लाखो आकाश दीवे आकाशात रात्रीच्या प्रहरी सोडतात. भारतातून लुप्त झालेला प्रज्ञावली सण विदेशातील बौद्ध लोकं मात्र आनंदाने साजरा करतात.
दिपावलीच्या दिवशी मोग्गलायन यांची हत्या झाली म्हणून त्याचे दु:ख मानून पुन्हा दु:खी होण्यात काहीच अर्थ नाही. मोग्गलायनच्या काळाला अडीच हजार वर्षे होऊन गेले आहेत. अडीच हजार वर्षापूर्वीच्या दु:खद गोष्टीला पुन्हा हजारो वर्षे कुरवळत बसण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या पंजोबाने चूक केली म्हणून त्याची शिक्षा माझ्या नातवाला देता येणार नाही. मोग्गलायनची हत्या ही त्याच्या कर्म सिद्धांतानुसार झाली होती. तरुणपणात त्याने केलेल्या रक्तपाताचा मोबदला त्याला बुद्धाचा धम्म स्वीकारल्यानंतरही स्वत:च्या प्राणाच्या रुपात द्यावा लागला होता. मोग्गलायनच्या हत्येनंतर बुद्धाने आवर्जून त्याच्या शिष्यांना कर्म सिद्धांत सांगितला होता.
मोग्गलायनच्या मृत्यूचे आम्हा सर्वांपेक्षा तर दु:ख बुद्धाला झाले असेल. मग तो दिवस काळा दिवस म्हणून साजरा करा असे तर कुठेच बुद्धाने सांगितले नाही. कारण बुद्धाची दृष्टी ही सम्यक होती. जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन सुंदरतेचा होता.
बुद्ध म्हणतो, ‘जीवन हे सुंदर आहे.’ त्याला जपा. दु:खाने विव्हळत बसा असे कुठेच बुद्ध म्हणाला नाही. उलट दु:खावर मात कशी करावी याचेच तत्वज्ञान त्याने आयुष्यभर पेरले. मोग्गलायनचं दु:ख मानत बसलो तर बुद्ध आणि सम्राट अशोकाच्या कार्याला तिलांजली द्यावी लागेल. उलट त्या दिवशी आम्ही दिवे लावून बौद्ध संस्कृती जपून बौद्ध धर्मानुसार दीपावली साजरी करून बुद्धाच्या महान शिष्याला आदरांजली द्यायला हवी, ना की दीपावलीच्या दिवशी सर्व जग आनंदात मग्न असतांना दरवाजे बंद करून दु:ख करण्यात पराक्रम असावा. बुद्ध धम्म मनुष्याला मनुष्यातून उठवून एकट्यात नेत नाही. धम्म निराशा देत नाही तर तो आशावाद जपतो. मागील पन्नास वर्षाच्या काळात जर १४ एप्रिलला जर एखादी वाईट घटना घडली असती तर आम्ही बाबासाहेबांची जयंती १४ एप्रिलला साजरी न करता तो दिवस काळा दिवस म्हणून मानला असता का? नाही ना! म्हणजेच एखाद्याच्या मृत्यूमुळे महान अशा माणसाच्या कार्याला तिलांजली देता येत नाही. बुद्धाचा धम्म हा मनुष्याला पदोपदी सुख, आनंद प्राप्त करून देतो आणि तेच बुद्धाच्या धम्माचे अधिष्ठान आहे. जर दीपावलीच्या दहा दिवसात मनुष्य धम्म स्वीकारून दु:खी होत असेल तर अशा धम्माची मनुष्याला गरजच काय ? पदोपदी हे करू नका ते करू नका सांगणारा बौद्ध धर्म कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असेल तर विवेकी व्यक्तीने निधर्म होणे पसंद केले असते. त्याने बौद्ध धर्मही स्विकारला नसता.
बुद्ध हा प्रकाशाचा प्रणेता होता. त्याला अंधार प्रिय नव्हता. बुद्धाने कुठेच म्हटले नाही की, लोक दीवे लावून आनंद साजरा करत असेल तेव्हा बौद्धांनी घरात अंधार करून बसावे. दीपावली प्रकाश देते आणि बुद्धाला प्रकाश प्रिय होता. हजारो वर्षाच्या काल्पनिक कथांना उराशी बाळगून आजचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय करण्यात काहीच अर्थ नाही. बुद्धाच्या सिद्धांतानुसार आम्ही नेहमीच परिवर्तनशील असायला हवे. ना की हजारो वर्षापूर्वी घडलेल्या काल्पनिक गोष्टींचा खुन्नस बाळगण्यात आणि बदला घेण्यात अग्रेसर असायला हवे. जे आनंददायक, सुखकारक आहे ते नेहमीच स्वीकारायला हवे. द्वेशात्मक भूमिका मांडणारे आणि द्वेष पसरविणारे बौद्ध होऊच शकत नाही. मुळात ज्यांनी बळीराजा, वामन, इंद्र ,विष्णू आदींवर संशोधन केले ते विसरून गेले की कुठेतरी यांचे महत्व मांडता मांडता ते बुद्धावरच प्रतिक्रांती करत आहेत. बौद्धांची दीपावली त्याच प्रतिक्रांती वादात वाहून गेली.
दीपावली हा बौध्दांचा सण आहे की हिंदूंचा हे महत्वाचे नाही. भारतातील बहुतेक सण शेतकरी (Landowner) व मजूर (Landless labour) यांच्या आर्थिक उत्पन्नावर आधारित आहेत. या दोन वर्गाना जेव्हा जेव्हा आर्थिक उत्पन्न झाले तेव्हा त्यांनी हजारो वर्षांपासून उत्सव साजरे केले. या दोन वर्गाना वर्षातून रब्बी आणि हंगामी पिकातून आर्थिक फायदा होतो. हंगामी पिकातून येणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून दीपावली तर रब्बी पिकातून होणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर होळी सणाची सुरवात झाली असावी. कारण भारत हा शेतकरी आणि मजूरांचा देश आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे पिक विकल्या गेले तेव्हा तेव्हा सण त्यांनी साजरे केले. जर पावसाळ्यात पिक नाही झाले तर आजही शेतकरी दीपावली साजरी करीत नाहीत. कारण त्यांच्याकडे दीपावली साजरा करायला पैसे नसतात.
मी आणि माझे कुटुंब बुद्धाच्या आणि सम्राट अशोकाच्या महान कार्याचा आनंद दिव्यांच्या रुपात घेणार. मी बुद्धाजवळ दीप लाउन सर्वाना सोबत घेउन वंदना घेणार. मी घरात प्रकाष करणार. अंधार मला प्रिय नाही. ज्याला घरात अंधार प्रिय असेल त्याने लाईट बंद करून खुशाल मातम करावे. ही त्याची हिंदू धर्माच्या दीवाळीशी माझा तिळमात्र संबंध नाही ना त्यांच्या देव देवतांचा आणि या लेखाचा सुद्धा.
या निमित्ताने आम्ही हिंदूंच्या दिवाळीच्या भानगडीत न पडता बुद्धाजवळ दीप प्रज्वलीत करणे, वंदना घेणे, धम्म ग्रंथाचे एखादे प्रकरण समजून घेणे आणि समजाउन सांगणे,
बौद्ध स्थळाना भेटी देणे, पैशाचा अपव्यय न करता गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाला पैसे देणे, त्याना भेटवस्तू, कपडे देणे, वृद्धाश्रमाला भेट देउन आर्थिक सहाय्य करणे, हे काम करु शकतो. माझ्या विचाराशी आपणही सहमत असावे. अशी जबरदस्ती नाही. प्रत्येक व्यक्तीचे वैचारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेखक आबाधित ठेवतो.
लेखक :- हर्षवर्धन ढोके
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत