डॉ.बाबासाहेब आंबेडकर “शाळा प्रवेश” दिन मौजे ढोकी येथे भारतीय बौध्द महासभा आणि श्रावस्ती बुद्धविहाराच्या वतीने उत्साहात साजरा !

पत्रकार – विजय अशोक बनसोडे
धाराशिव : दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी धाराशिव शहरात व तालुक्यातील मौजे ढोकी जय भवानी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाच्या औचित्याने दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया,ता. शाखा धाराशिव आणि श्रावस्ती बुद्ध विहार ढोकीच्या वतीने सायंकाळी ठीक 06.30 वा धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथागतांचा कर्म सिद्धांत, भारतीय संविधानाची अंमलबजावणी का होत नाही ? या विषयावरील धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब देविदास बनसोडे
ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांची उपस्थिती होती. तर या धम्मप्रवचणाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब जानराव जि.महासचिव वंचित बहुजन आघाडी, विद्यानंद भागवत वाघमारे जि.संघटक भारतीय बौद्ध महासभा, विजय अशोक बनसोडे जि संघटक,भारतीय बौद्ध महासभा, यांची उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचा पुष्पदीप दुपारचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळा प्रवेश दिनाच्या या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवराज पौळ -आळणी, आण्णासाहेब पौळ- आळणी, वाघमारे सुमित, उत्तम ओहाळ, विनोद इंगळे, नरेंद्र कसबे, संपत जाधव, वैजनाथ ढवारे, सोमनाथ वाघमारे, भारत साळुंखे, शशिकांत सोनवणे -तेर, प्रद्युम्न श्रीमंत तेरकर, समाधान सरवदे वानेवाडी, अजय सरवदे वानेवाडी यांच्यासह श्रावस्ती बुद्ध विहार ढोकी येथील समस्त बौद्ध उपासक व उपासीका, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भारतीय बौद्ध महासभा जि.संघटक, आयु. विजय बनसोडे यांनी
भारतातील संसदीय लोकशाहीचे आणि भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे ही जबाबदारी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची आहे असे सांगितले. कारण आपणास माहित आहे की, या देशामध्ये हजारो वर्ष इथल्या अठरापगड जातीचा समावेश असलेला बहुजन समाज जाणीवपूर्वक शिक्षणापासून वंचित होता. त्याच शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराने दिला आहे. याची जाणीव प्रत्येक समाजातील विद्यार्थ्याने ठेवून आपणास मिळणाऱ्या शैक्षणिक अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे विचार मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी साळुंखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिनेश कांबळे यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत