जळगांव जिल्ह्यात एरंडोल नगरपरिषदेनं साकारला तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगिचा.

जळगांव जिल्ह्यात एरंडोल नगरपरिषदेनं तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगिचा साकारला आहे. राज्यातला अशा प्रकारचा हा एकमेव बगिचा आहे, अशी माहिती एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली. पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत. प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचा बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधलेल्या ओट्यावर बसून वाचता येणार आहे. भिंतीवर विचारवंताचे पुस्तकात व्यक्त केलेले विचार चित्रीत करण्यात आले आहेत तर ठिकठिकाणी कवितांची पोर्ट्रेट आहेेत. कवयित्री बहीणाबाईंचं भव्य शिल्प उभारलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत