यंदाच्या खरीप हंगामात देशातलं अन्नधान्याचं उत्पादन १ हजार ४८५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं २०२३-२४ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अंदाज, प्रसिद्धपत्रकाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार देशातलं अन्नधान्याचं उत्पादन १ हजार ४८५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
तांदळाचं उत्पादन, १ हजार ६३ लाख मेट्रिक टनाहून जास्त, मका उत्पादन २२४ लाख मेट्रिक टनाहून जास्त, तर तूर, मूग, उडीद अशा कडधान्यांचं मिळून उत्पादन ६३ लाख ३१ हजार मेट्रिक टन इतकं अपेक्षित आहे. ऊस उत्पादन ४ हजार ३४७ लाख मेट्रिक टन होईल, असा अंदाजही या पत्रकात नमूद केला आहे.
भातपिकाखालचं क्षेत्र मागील वर्षीच्या अंतिम अंदाजापेक्षा सुमारे दोन लाख हेक्टरनं आणि भाताच्या सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे ४ . ५ लाख हेक्टरनं जास्त असल्याचा अंदाजही, विभागानं व्यक्त केला आहे. खरीपातल्या सरासरी भात उत्पादनाच्या तुलनेत, या क्षेत्रावरच्या भाताचं उत्पादन सुमारे एक लाख टनांनी जास्त असेल असा अंदाजही, या पत्रकात नमूद केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत