धर्मांतराने काय झाले.?

पिढ्यानपिढ्या चालत आलेली कामे मग लाकूड फोडणे असेल, मेलेल ढोर ओढणे असेल, दवंडी देणे असेल हे सारे नाकारले. हे एका अर्थाने मोठे बंड होते. शेकडो वर्षांपासून घरात पूजल्या जाणाऱ्या शेकडो प्रतिमा नदीत फेकून दिल्या, मरीआईचे मंदिर ओस पडली. धर्मांतरा नंतर गल्ली गल्लीत बुद्ध वंदना निनादु लागली. सगळे आखाडे, विठ्ठल मंदीराचे रूपांतर बुद्ध विहारात होऊ लागले. त्यांच्या पुढील जात-धर्म जाऊन बौद्ध असे सांगू लागले. मुलांची, घराची, गावाची, रस्त्याची एव्हाना संस्थाची नावे बदलू लागली. एक नवीन अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जुलूम याच्या विरोधामध्ये ठाम पणे उभा टाकू लागला. गुलामीची सारी प्रतीके या समाजाने भिरकावून दिली.
बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतीके सगळी कडे दिसू लागली. बौद्ब स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूम धडाक्यात साजरी होऊ लागली. जत्रेवर होणारा प्रचंड खर्च, बोकड्या कोंबड्याचा बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचा काहूर उसळू लागला. लग्न विधी, नामकरण विधी, अंत्यविधी बदलले. लग्न मरणातल डफड गेलं, हलगी गेली, केवळ त्रीशरणाचा आवाज घुमू लागला. अंगारे, धुपारे, बुवा बाबा मार्गी लागले. गावाची चाकरी गेली. समाज गावगड्यातून बाहेर पडला. पोताराज्यानी अंगावरची आईची वस्त्र धडक्यात गुंडाळून नदीत सोडले.
मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणाला मुठमाती दिली. लोकांनी खेडी सोडा शहराकडे चला हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र स्वीकारला. आणि लोक गावाच्या नरकातून या गुलामगिरीच्या जोखडामधून बाहेर पडले. ईश्वर, कर्मकांड या लफड्यातून बाहेर पडले. काल पर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसर्जित केली. गप गुमान अंगातले देव निघून गेले. #लोकदास्यतेतूनमुक्त_झाले..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी रक्ताचा एक थेंब ही न सांडवता जगातली सर्वात मोठी धार्मिक क्रांती, विचार परिवर्तन क्रांती घडवून आणली म्हणून आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत