
मिलिंद फुलझेले
बेरोजगारी आणि महागाईने पराकोटीची त्रस्त जनता मोदी सरकार सत्तेतून कधी जाते,यांची आतूर होवून वाट बघत आहे.तशीच आतुरता विरोधी पक्षांना झाली आहे.कारण मोदींचे सरकार,आपल्या नियंत्रित सर्व यंत्रणा मार्फत एक-एक करीत त्यांचे राज्या-राज्यांतील सरकार पाडत आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करीत आहेत.अशा प्रकारे केविलवाणी अवस्था जनता आणि विरोधी पक्षांची झाली आहे.वास्तव असे,मोदींचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व संघटनांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या आधारावर भक्कमपणे उभी आहे.तो आधार म्हणजे ‘ हिंदुत्व ‘ आहे.हिंदुत्व हे सामाजिक व सांस्कृतिक अशी दुधारी आहे.ती बहुसंख्यांक आहे. तोच आधार घेत महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा लढा चालविला होता.त्यांनी मुस्लिमांना राजकीय दृष्टीने गोंजारले पण आपले सनातनी हिंदुत्व नाकारले नाही. त्यालाच पुढे स्वतंत्र भारतात तीन टक्के ब्राम्हणांनी आधार बनवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघा द्वारे हिंदूत आपले पध्दतशीर जाळे निर्माण केले.म्हणजे आपल्या जातीचे चरित्र लपवित,जाती ऐवजी धर्म पुढे केला.गैरहिंदुंना हिंदुंचा शत्रू सांगत हिंदुंना आपल्या सत्वावर हिंदू म्हणवत आपला सामाजिक, सांस्कृतिक आधार मजबूत केला. आणि आज सत्तेत भक्कम झाले.तसे काही संविधानाचा थोडा धाक ठेवून कांग्रेस व इतर पक्षांनी केले नाही.त्यांनी केवळ सत्तेसाठी बनवाबनवीचे राजकारण खेळले.असे असले तरी त्यांच्या पक्षावर आणि सत्तेत वर चष्मा हा मूठभर ब्राह्मणांचाच राहिला.त्यांनी पुढे सामाजिक व सांस्कृतिक आधारावर बनिया व जमिनदारांना आपलेसे करुन घेतले.हे त्रिवर्णियांचे षडयंत्र कधीही बहुजन समाजाने समजून घेतले नाही.ते आपल्या जाती,उपजातीच्या छद्मी अहंकारात आणि हिंदू म्हणून ब्राह्मण्यवादी कर्मकांडी सांस्कृतिक संस्कारात जगण्यात धन्यता मानत राहिले.आताही त्याच कृतीशील मानसिकतेत जगत आहेत.अशात ब्राह्मणी सरकारचे चटके बसू लागले,तेव्हा कुठे भानावर येण्याचा प्रयत्न करीत आहेत.पण यातही ते ब्राह्मणी सामाजिक, सांस्कृतिकरणातील जगणे नाकारण्यास तयार नाहीत.मग जुलमी मोदी सरकार कसे सत्तेतून घालविणार ? माणूस बदलेल पण सामाजिक व सांस्कृतिक सत्व बदलणार नाही.संपूर्ण सत्तांतर घडवून आणण्यासाठी लोकांची सामाजिक, सांस्कृतिक मने बदलावी लागतात.बुध्दाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीतून पुढे लोककल्याणकारी सम्राट अशोकांचे साम्राज्य उदयाला आले.मध्ययुगात वारकरी संप्रदायाच्या सामाजिक व सांस्कृतिक जागराने छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे स्वराज्य स्थापता आले. भिमाकोरेगावच्या युध्दात पेशवाई संपुष्टात आल्याने फुले-शाहू-आंबेडकर निर्माण झाले.आणि समाजिक परिवर्तनाची चळवळ जोमात आली.ज्याचा लाभ संविधानिक भारत उभारण्यास झाला. महान इतिहास संशोधक डॉ.बाबासाहेब आंबेडकर असेच काही दाखले देत राजकीय परिवर्तनासाठी अगोदर सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीची गरज असते.ब्राह्मणी हिंदुत्व ही लोककल्याणकारी नाही.ती प्रतिक्रांतीची पाईक आहे.म्हणून त्यांनी त्यासाठी धर्मांतर घडवून आणले.बुध्द धम्माचा स्वीकार हा लोकशाहीनुरुप सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीच्या दिशेने जाणाऱ्या पाऊलवाटा होत्या.त्याला सत्ताधारी कांग्रेस सरकारनी अडवून धरल्यात.त्याचा परिणाम हा आज संघाने आपली हिंदुत्वावरुन सामाजिक,सांस्कृतिक सत्व बहुजनात मजबूत करण्यास वावदायक ठरली.आणि त्या आधारवर भाजपच्या रूपाने राजकीय सत्ता मिळवून ती भक्कम केली आहे.आणि आता त्या द्वारे प्रतिक्रांती घडवून आणण्यास पुढे वेगाने सरसावली आहे.
सामाजिक व सांस्कृतिक क्रांती घडवून आणण्यासाठी अगोदर आपण आपला इतिहास समजला पाहिजे.त्यासाठी तो वाचावा लागतो.तसे करण्यास ही बहुजन समाज तयार नाही.आणि जे काही थोडे,थोडके इतिहास वाचक व संशोधक आहेत,त्यांना इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागेल.कारण ब्राह्मणांनी इतिहासाचे विद्रुपीकरण केले आहे. म्हणून इतिहास संशोधन व पुनर्लेखन करण्याची नितांत गरज निर्माण होते.ती जबाबदारीने करण्याचे काम आंबेडकरी समाजातील नवलेखक, विचारवंत, अभ्यासक करीत आहेत.यात आता ओबीसी समाजातील काही प्रज्ञावंत मंडळी पुढे जिद्दीने येतो आहे.त्यात आता ओबीसी महिला ही मागे राहिल्या नाहीत.त्या वाचन व लेखन हिरीहिरीने करीत आपले स्वतंत्र साहित्य विश्व उभे करायला लागल्या आहेत.यात प्रस्तुत संपादकांच्या पुढाकाराने,विजया मारोतराव, माधुरी गायधनी यांच्या व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी गेल्या तीन वर्षांपासून फुले-शाहू-आंबेडकरी ओबीसी महिला साहित्य संमेलनाने यशस्वीपणे होवू लागले आहेत.यात सहभागी ओबीसी महिलांत सांस्कृतिक बदल घडवू येताना दिसत आहेत.कोणत्याही परिवर्तनासाठी अगोदर तसे विचार व्यक्तीच्या मनात निर्माण होणे आवश्यक असतात.वाचन हे डोक्यात विचार प्रसूत करीत असतात.ते विचार कोणत्या कृतीचे असावे,हे साहित्य सृजकावर असते.आंबेडकरी व ब्राह्मणी अशी परस्पर विरोधी चळवळ ज्या पध्दतीने विचाराने समृध्द दिसते,त्या मागे आधार हा तशा साहित्य सृजनाचा राहिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,जेव्हा त्यांच्या अस्पृश्य समाजाला वाचता,लिहिता येत नव्हते,त्या काळी १९२० मध्ये ‘ मूकनायक ‘ हे आपले पाक्षिक काढले.ती अखंडाता आपल्या हयातभर ‘ प्रबुद्ध भारत ‘ पर्यंत जोपासली.तीच परंपरा आंबेडकरी समाज विविध स्तरांवर लहान-सहान पत्र-पत्रिका, दैनिक, साप्ताहिक काढत सांभाळत आहे.तर समाजातील अंगभूत गायक,कलावंतांनी आपल्या वाणी व कलेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला सातत्याने स्मरणात आणून देतात.त्यामुळे आंबेडकरी समाजात वैचारिक दृष्ट्या चैतन्य आहे. सामाजिक, सांस्कृतिक जागृकता आहे.ती अबाधित ठेवण्यासाठी आम्ही दैनिक बहुजन सौरभ काढत आहोत.त्यात लिहिणारे बरेच लेखक ओबीसी महिला,पुरुष आहेत.पण आंबेडकरी समाजा सारखा समूह अजून पुढे आला नाही.हे कटू वास्तव आहे.त्याचे कारण ओबीसीत सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाच्या जाण-जाणिवा पाहिजे तेवढा पोटतिडकीने आल्या नाहीत.तोच फायदा ब्राह्मण उचलत आपल्या सांस्कृतीकरणाचा घोडा मोठ्या वेगाने हाकलत आहे.मग मेटाकुटीला आलेल्या जनतेस राजकीय परिवर्तन कसे घडून येणार ?
सत्तेच्या जोरावर प्रशासनात असलेली ब्राह्मण मंडळी पुन्हा देशाच्या गौरवशाली इतिहासाला आपल्या रंगात रंगवून विद्रूप केल्या करीत आहे.ती प्रक्रिया त्यांनी सुरू केल्याचे गुगल सर्च मधून प्रतिबिंबित होते.मौर्य, हर्षवर्धन अशा देशाच्या प्राचीन राजवंश घराण्यांची नोंद बौध्द धर्मासोबत हिंदू धर्मिय अशी पुष्टी जोडलेली गुगल सर्च मध्ये आढळून येते आहे.पूर्वी तसे दिसून येत नव्हते.आम्हाला वाटते,त्या अलीकडील घुसखोऱ्या असाव्यात.आणि ते धर्माचे कथित ठेकेदार ब्राह्मणां शिवाय दुसरा कोण करु शकतो ? बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नसल्याने ब्राह्मणांनी स्वतः च्या हिताला अनुकूल असा इतिहास लिहिला आहे.तो खरा नाही.वास्तवाचे विदृपीकरण आहे.आता केंद्रात संघी मोदींचे सरकार आल्यानंतर गुगल सर्च मधील बरीच माहिती, संदर्भ वगळलेले आढळून आलेत.ते प्रामुख्याने ब्राह्मण,त्यांचे कथित हिंदुत्व,कट-कारस्थान एकूण ब्राह्मण व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराच्या विरोधात जाणाऱ्या घटना, प्रसंग अशा काही संदर्भांना गहाळ केल्याचे लक्षात येवून जाते. आणि त्याच बरोबर त्यांनी बहुजन समाजाचे पुन्हा नव्या दमाने सांस्कृतिकरण करण्यास ही भक्कम प्रयत्न चालविला आहे.पुरोगामी महाराष्ट्रात दहीहंडी, गणेशोत्सव हे यावेळी मोठ्या प्रमाणावर होत आहेत.त्यासाठी ईडी सरकार बक्षीस व सवलती जाहीर करून प्रोत्साहन देत आहे.
सम्राट असोक यांचा काळ हा आपल्या देशातील जसा इतिहास लेखनाचा आरंभ बिंदू आहे तसाच तो सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परीवर्तनाचाही काळ आहे.बुध्दाने तशा वातावरणाचे तत्वज्ञान सांगून निर्मिती केली तर पुढे सम्राट असोकांनी त्याला गतिमान केले.अर्थात क्रांती घडवून आणली.ती प्रचलित ब्राह्मण धर्मा विरुद्ध होती.त्यामुळे ब्राह्मणांचे आयते विलासित जगते, सामान्य लोकांवर हुकूमत गाजविणे संकटात आले.
मौर्य वंशाने १३८ वर्ष राज्य केले.त्यातील सुरुवातीचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य व सम्राट बिंदूसार वगळले तर बुध्द धम्म प्रभावातील मौर्यवंशाचा राज्य कारभार हा ८८ वर्षांचा राहिला.इ.स.पूर्व १८४ मध्ये मौर्यवंशाचा अखेरचा सम्राट बृहद्रथ यांची हत्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र सुंगाने केली.आणि काही काळ ब्राह्मणी राज्य वर्चस्व स्थापित झाले.याच काळात ब्राह्मणांनी इतिहासाला आपल्या रंगात रंगविण्याचा प्रयत्न केला.मनुस्मृतीची संहिता मांडली.बुध्दाच्या तत्वज्ञानात हेरफेर करून योग मांडले.बरेच काही पध्दतीचा अंगिकार भिक्खू आणि धम्म संस्कृतीतून घेत ,बुध्दाने प्रतिपादन केलेले सर्वकाही आमच्यापासून घेतले . असे लोकांवर बिंबविण्याचा प्रयत्न केला.ते स्वामी विवेकानंद,पं.जवाहरलाल नेहरु आणि बऱ्याच इतिहास संशोधक, अभ्यासकांनी मांडले आहे.
हल्लीचे सण,उत्सव ,मेळे असे बरेच काही देखील ब्राह्मणांनी बौध्द राजे यांच्या पासून फेरफार करून घेतले आहेत.सण,उत्सव सम्राट असोक पूर्वी नव्हते.जन्म,विवाह प्रसंगानुरूप उत्सवांचा उल्लेख मिळतो.यज्ञ , कर्मकांड वगैरे होते.पुढे मेळावे,उत्सव हे प्रकर्षाने बौध्द सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात दिसतात.तो काळ इ.सनातील ६०६-६४७ दरम्यानचा आहे.सम्राट हर्षवर्धन यांनी राजधानी कन्नौज येथे चिनी प्रवासी ह्येनसांग यांच्या सन्मानार्थ धर्म चर्चेचे मोठे आयोजन केले होते.त्याच वर्षी प्रयाग येथे गंगेच्या काठावर मोठा उत्सव केला होता.बुध्द मूर्तीची भव्य मिरवणूक काढली होती.दानधर्म केला होता.त्यांच्या अखेरच्या वंशाची ब्राह्मण सेनापतीने हत्या करुन राज्य बळकावले होते.बौध्द राज्यांची हत्या ब्राह्मणांनी घडवून आणल्याचे दिसून येते.ती हत्या म्हणजे त्यांची प्रतिक्रांती होती.
आपली प्रतिक्रांतीला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अगोदर सांस्कृतिक हत्यार वापरले.ते विकृतीकरण होते.सम्राट असोक यांच्या क्रांती प्रतिमेला घेवून ब्राह्मणांनी राम- रावण उभा केला.सम्राट हर्षवर्धन यांच्या प्रतिमेचे कुंभमेळ्यात विकृतीकरण केले.आणि इतिहास आपल्या सोयीचा लिहिला.तो खोदून काढत त्याचे पुनर्लेखन करण्याची जबाबदारी ही आंबेडकरी समाजाची आहे.तो बऱ्याच प्रमाणावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून , त्यांच्या लेखनात विषयी मार्गदर्शक तत्वे सांगितले आहे.तो अस्पृश्य मूळचे कोण ? , शुद्र पूर्वी कोण होते? आणि बुध्द आणि त्यांचा धम्म या प्रमुख ग्रंथातून मिळतो.त्यांच्या पूर्वी महात्मा फुले नंतर आचार्य चतुरसेन शास्त्री, डॉ भाऊ लोखंडे,ए.आर.बाली, सुरेंद्र कुमार अज्ञात , राजा ढाले,प्रा.अरुण कांबळे , प्रा.मा.म. देशमुख,सम्राट असोक यांच्या विषयी प्रथम सखोल संशोधन केलेले बंगालचे बेनीमाधव बरुआ, रोमिला थापर, आदिवासी भाषा व संस्कृती वर सखोल अभ्यास व संशोधन करुन ती बौध्द धम्माची आहे,असे मांडणारे वर्धेचे व्यंकटेश आत्राम आता आता नवीन पीढीत डॉ.अश्वीर गजभिये यांचा नावाचा उल्लेख करता येईल.यांनी आपली चिकित्सक व निरपेक्ष संशोधक बुध्दी वापरून इतिहासाचे लेखन केले आहे.आपले लेखन व चिकित्सक कार्य धम्म तत्वज्ञान अधिक तर्क युक्त मांडण्या बरोबर काही प्रमाणात नवइतिहास निर्माण करणारा देखील राहिला आहे.त्या कामी आपल्या पत्र- पत्रिका, दैनिकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे व आताही बजावत आहेत.पण ज्यात ब्राह्मणी धर्म,पोथी- पुराण, कर्मकांड याचे प्राण आहे,अशा आपल्या प्राचीन इतिहासाचे,संशोधन करुन ,त्याची पुर्नमांडणी, लेखन फारच कमी केले आहे. संशोधनाच्या नावाखाली केवळ ब्राह्मण लेखकांच्या ग्रंथातील उतारे संदर्भ म्हणून घेत राहिलो,मग देशाच्या खऱ्या इतिहासाशी न्याय कसा करणार ? कारण ब्राह्मण धर्म व संस्कृतीचा पाया त्यांनी लिहिलेला खोटा व विकृत इतिहास आहे.त्या पायावर वार झालाच पाहिजे.तेव्हाच ब्राह्मणी धर्म व वर्चस्व पुन्हा प्रतिक्रांती करणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत