देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भाजपा महाराष्ट्रातून पराभूत होत आहे, एक निरीक्षण आणि कारण मीमांसा ! – ॲड. अविनाश काले

साधारणतः 1986 पासून मी वृत्तपत्रीय लिखाण करता करता थेट संपादक म्हणून साप्ताहिक ते दैनिक असा प्रवास 2015 पर्यंत केला .
नोट बंदी नंतर आमचे दैनिक महापर्व आर्थिक अडचणीत आले आणि घरघर लागून ते बंद ही पडले , यास सर्वात अधिक मोठे कारण प्रिंटिंग कालबाह्य होऊन सोशल मीडिया द्वारे आलेल्या इंटरनेट क्रांती मुळे वृत्तपत्रीय व्यवस्थाच उखडून फेकली गेली .
त्यात ही ग्रामीण भागात शोध पत्रकारितेला वाव कमीच असतो ,
परंतु लिखाणाची सवय कांहीं थांबली नाही .
“लागले वळण सकल इंद्रियाशी ” असा हा प्रकार , व्यक्त होणं ही माझी मानसिक गरज म्हणा किंवा आजार म्हणा , पण यातून थेट अनेकांशी जोडलो गेलो ,
साध्या व्हॉट्सॲप द्वारे ही महाराष्ट्र , कर्नाटक , गुजरात (बडोदा) अश्या सर्व पक्षीय आणि संघटना यांचे शी व्यक्तिगत रित्या जोडला गेलो आहे ,
यामुळेच अनेक फीडबॅक मिळत राहतात आणि प्रत्यक्ष माहिती , सामाजिक कल ही कळत जातात .
त्या आधारेच मी हे विधान केले आहे की ,
भाजपा ने भले ही 45+चां नारा दिला असेल , त्यांचे नेते उसने अवसान आणून मोदी जी मुळे परिस्थिती बदलली आहे आणि पुन्हा एकदा भाजपा च विजयी होत आहे असा दावा जाहीर रित्या करत असले तरीही
खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम ही प्रचंड तणावातून जात आहे ,
आणि त्यांचा आत्मविश्वास खालावला असून त्यांचेवर कमालीचे मानसिक दडपण वाढलेले आहे .
उमेदवार निवडी तील चुका आहेत का? तर असे ही नाही , याचे कारण कसलीच आयडेंटिटी नसताना ही अगदी नवखे उमेदवार देऊन ही त्यांनी 2019मध्ये त्यांना निवडून आणलेले होते , आणि या मागे खरोखर त्यांनी निर्माण केलेल्या “मोदी “नावाच्या चेहऱ्याचे नायकत्व होते .
2014 साली सत्ता कारणात त्यांनी नोट बंदी सारखे धाडसी प्रयोग केले ,
डिजिटल क्रांती चे माध्यमातून प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारांवर सरकारची नजर राहिली ,
जी एस टी चे स्लॅब रचनेतून राज्याचे उत्पन्नाचा स्त्रोत सरळ केंद्रा कडे वळवून त्याचा परतावा राज्याकडे देण्याची शक्ती केंद्राकडे आल्याने राज्य ही केंद्रीय शक्तीचे अधीन आली ,
जिथे विरोधी पक्षाचे सरकार अस्तित्वात असेल अश्या राज्याचे आर्थिक परतावे रोखून धरले गेले ,
यातून विकास करण्याची राज्य सरकारांची शक्ती क्षीण करण्यात आली ,
तरीही दुसऱ्या टर्म मध्ये भाजपा चालली ,
“पूर्वीच्या सरकारची घाण साफ करण्यात आमची कांहीं वर्ष गेली , असे भाजप ने म्हणले आणि लोकांनी ही त्यास दुजोरा दिला .
2019चे विधानसभा निवडणुकीत भाजप ने चांगला परफॉर्मन्स केला , आणि 105जागा घेऊन विधानसभेत पोहचली.
सत्ता समीकरण जुळवण्या साठी अजित दादा यांना कळपात ओढून सत्ता स्थापनेचा प्रयोग ही केला गेला तो फक्त 80तास चालला.
अजित दादा यांना परत माघारी बोलाऊन शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय या तीन पक्षाने एकत्रित येऊन सरकार बनवून भाजपा ला सत्ता बाह्य केले .
आणि त्या नंतर कोविड चां काळ सुरू झाला ,
या कठीण काळात मुख्यमंत्री म्हणून पूर्व अनुभव नसलेल्या उद्भव जी ठाकरे यांनी समग्र महाराष्ट्राला सावरले , उत्तर प्रदेश आणि बिहार सारखी राज्य या आपत्ती व्यवस्थापनात कमी पडली ,
शेकडो चीता जळताना त्या चीतांच्या जळणाऱ्या ज्वाला चां प्रकाशाने शहरे आणि आसमंत ही लाल झालेला लोकांनी पाहिला ,
अगदीच सुमार बुध्दी चे शोध लाऊन लोकांना घंटा नाद , ते थाळ्या नाद करून आणि “गो कोरोना गो ” सारखे नारे देऊन रोगाचा प्रतिकार करू पाहणारी अंधभक्तांची टोळी जगाने पाहिली , आणि असा आदेश देणारे सर्वोच्च पंतप्रधान ही पाहिले.
“भारतीय माणसांचा बुध्यांक तपासणारी ही संघ प्रणित व्यवस्था होती “
बहुसंख्य जनतेचा मेंदू आपण कब्जात घेतलेला आहे असे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांचा उत्साह वाढला ,
देश झुकतो आणि महाराष्ट्रातील हे सरकार झुकत नाही ही बाब राज्यातील नेत्यांचा इगो वर आघात करणारी होती .
यातूनच केंद्रातून पाठवलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चे आधारे अनेक अडथळे सरकार चालवताना घातले गेले , नवनीत राणा , अभिनेत्री कंगना , सदाभाऊ खोत , आ गोपीचंद पडळकर, ऍड गुण रत्न सदावर्ते या मंडळी नी इतका आकांडा तांडव महा विकास आघाडी समवेत केला की विचारता सोय नाही ,
“हनुमान चालिसा ” “भोंगे ” अशी धार्मिक उन्मादाची प्रकरणे ही सुरू राहिली , किरीट सोमय्या यांच्या द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदा विरोधकांचे आर्थिक घोटाळे , त्या नंतर सुरू झालेली धाड सत्रे , कारवाया , आणि यातून अनेकांचे झालेले मानसिक खच्चीकरण , कारवाईच्या टांगत्या तलवारीची अदृश्य भीती ,,,,
यातून शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस या मधील मोठा गट फोडण्यात व त्यांना स्वतः शी जोडून घेऊन भाजप प्रणित सत्ता आणण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले .
हा सर्व उघडा नागडा तमाशा जनता पाहत होती , पण जनता ही कांहीं करू शकत नव्हती ,
एक साधा रिक्षा चालक शिवसेनेच्या माध्यमातून अब्जाधीश बनल्याचे जनतेने पाहिले , आणि त्यांना गळाला लाऊन त्यांच्या माध्यमातून 40आमदार फुटून झालेले सत्तातंर पाहिले , तसेच पवार साहेबांचे पुतणे अजित पवार यांना ही फुटताना पाहिले , यातील कित्येकांच्या आरोपाच्या फायली बंद होताना पाहिले , आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकृत पक्षा नाच अनाधिकृत ठरवताना निवडणूक आयोगाला ही पाहिले ,
“जस्टिस डीले इज जस्टिस डीनाईड”
उशिरा दिलेला न्याय हा न्याय नाकारणे च असते , याचा ही अनुभव जनतेने घेतला
लोकशाहीच्या चारी खांबावर झाले ले भाजप चे अतिक्रमण , आणि “जीसकी लाठी उसकी भैस ” हे ही पाहिले
“पार्टी वुईथ डिफरन्स ” म्हणून शिस्तबद्धता , आणि सदाचार , राष्ट्रा प्रति समर्पित असा प्रचार करून निर्माण केलेली छबी अजित दादा , एकनाथ शिंदे , आणि शहाजी बापू पाटील यांच्या मुळे बरबाद झाली .
काल परवा पर्यंत आर्थिक कमजोर सदरातील आमदार शहाजी बापू भव्य असा दोन चार एकरातील महाल उभा करतो हे जनतेने पाहिले ,
“बिफ कत्तल खाण्या कडून 465कोटी चंदा घेणारी , आणि अदानी चे गुजरात मधील बंदरातून हजारो गाई अरब राष्ट्रात कत्तली साठी निर्यात होताना ही जनतेने पाहिले ,
यांचा “जय श्रीराम” चां नारा फक्त सत्ता निर्मिती साठी आहे आणि धर्म हा ही भाजप चा “चंदा “च आहे
हे जनतेला पटू लागले .
एक एक जागा निवडून आणण्या साठी भाजप ने केलेली धावपळ , आणि त्या साठी जनतेचा पैसा वापरून पाठवलेली चार्टर विमाने , त्या चर्चा गाजत असतानाच अभिजित पाटील चेअरमन असलेल्या विठ्ठल सह सा कारखाना जप्ती प्रकरण , आणि त्यांनी शरणागती स्वीकारल्या नंतर उठलेली जप्ती ही जनतेने पाहिली ,
रोजगार निर्मिती तील अपयश, शेती मालाचे बाबतीतील चुकीचे आयात निर्यात धोरण , वाढती महागाई , पडलेले दुधाचे दर , खाजगी करणाचा वाढलेला वेग , करार पद्घतिने केलेल्या भरात्या आणि या दरम्यान फुटलेले परीक्षा पेपर ,,,
फक्त अनागोंदी ,,,,,,,! आणि शासन म्हणून आलेले सामूहिक अपयश या मुळे महायुती ची विश्वासार्हता लोप पावली
तो करंट मला जन माणसात दिसला , या मुळेच महा विकास आघाडी मजबूत झाली आणि जन मत त्यांचे साठी अनुकूल बनले .
10माणसातील 7माणसे भाजप विरोधी बनलेली आहेत , आणि
निवडणूक रिंगणात कितीही उमेदवार असले तरी ही फक्त दुरंगी लढाईच होणार आहेत ,
मत विभाजनाचे सगळे प्रयोग जनतेने धुडकावून लावले आहेत हेच चित्र तुम्हास 4जून ला पहावयास मिळेल ,,,,, हे मात्र नक्की ,,,,
भाजपा दोन आकडी संख्या तरी गाठेल का? अशी शंका निर्माण व्हावी इतका भाजप चां ग्राफ खाली घसरलेला आहे , यातच सर्व कांहीं आले .
महाराष्ट्रात भाजपा दारुण पराभवाला सामोरे जात आहे.

ॲड. अविनाश टी काले, अकलूज
मो न :- 9960178213

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!